शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:41 IST

Parliament Session 2024: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव तसेच रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा ज्या फैजाबाद मतदारसंघात समावेश होतो तिथे भाजपाला बसलेला पराभवाचा धक्का चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. अयोध्येतील विजय हा भारतीय जनतेच्या परिपक्वतेचा विजय आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच ‘होई वही जो राम रचि राखा’, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपाला सुनावले. 

जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर उत्तर प्रदेशात भाजपाला त्याचा फायदा होऊन मोठं यश मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी एका कवितेच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. हा त्यांचा (देवाचा) निर्णय आहे, ज्यांच्या काठीला आवाज नसतो, असा टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. ते पुढे म्हणाले की, जे कुणाला आणल्याचा दावा करत होते. ते स्वत:च आज कुणाच्यातरी आधारासाठी लाचार झाले आहेत, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, संविधान हीच संजीवनी आहे. तसेच संविधानाचा विजय झाला आहे. संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा विजय झाला आहे. हे सरकार चालणार नाही तर लवकरच कोसळणार आहे. आता उत्तर प्रदेशच्या जनतेला एवढाच आग्रह आहे की, ज्या गंगेचं पाणी घेऊन सत्य बोलण्याची शपथ घेतली जाते, ते गंगाजल घेऊन किमान खोटं बोलू नये. विकासाचे ढोल बडवणारे विनाशाची जबाबदारी कधी घेणार? मंदिराचं गळणारं छत आणि रेल्वे स्टेशनची कोसळलेली भिंत यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

आम्ही जे रस्ते बांधले होते. त्यावर विमानं उतरली होती. आता उत्तर प्रदेशमधील मुख्य शहरातील रस्त्यांवर होड्या फिरत आहेत. आता आणखी पाऊस पडला तर होडीमधूनच प्रवास करावा लागेल. स्मार्ट सिटीच्या आश्वासनांचीही अशीच अवस्था झालेली आहे. मागच्या १० वर्षांमधील एकमेव कामगिरी म्हणजे परीक्षा माफियांचा झालेला जन्म हीच आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.   

टॅग्स :lok sabhaलोकसभाAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीfaizabad-pcफैजाबादAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर