शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:41 IST

Parliament Session 2024: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उत्तर प्रदेशमध्ये झालेला पराभव तसेच रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा ज्या फैजाबाद मतदारसंघात समावेश होतो तिथे भाजपाला बसलेला पराभवाचा धक्का चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अयोध्येत झालेल्या पराभवावरून भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. अयोध्येतील विजय हा भारतीय जनतेच्या परिपक्वतेचा विजय आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच ‘होई वही जो राम रचि राखा’, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपाला सुनावले. 

जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर उत्तर प्रदेशात भाजपाला त्याचा फायदा होऊन मोठं यश मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी एका कवितेच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपाला टीकेचं लक्ष्य केलं. हा त्यांचा (देवाचा) निर्णय आहे, ज्यांच्या काठीला आवाज नसतो, असा टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. ते पुढे म्हणाले की, जे कुणाला आणल्याचा दावा करत होते. ते स्वत:च आज कुणाच्यातरी आधारासाठी लाचार झाले आहेत, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, संविधान हीच संजीवनी आहे. तसेच संविधानाचा विजय झाला आहे. संविधानाच्या रक्षणकर्त्यांचा विजय झाला आहे. हे सरकार चालणार नाही तर लवकरच कोसळणार आहे. आता उत्तर प्रदेशच्या जनतेला एवढाच आग्रह आहे की, ज्या गंगेचं पाणी घेऊन सत्य बोलण्याची शपथ घेतली जाते, ते गंगाजल घेऊन किमान खोटं बोलू नये. विकासाचे ढोल बडवणारे विनाशाची जबाबदारी कधी घेणार? मंदिराचं गळणारं छत आणि रेल्वे स्टेशनची कोसळलेली भिंत यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

आम्ही जे रस्ते बांधले होते. त्यावर विमानं उतरली होती. आता उत्तर प्रदेशमधील मुख्य शहरातील रस्त्यांवर होड्या फिरत आहेत. आता आणखी पाऊस पडला तर होडीमधूनच प्रवास करावा लागेल. स्मार्ट सिटीच्या आश्वासनांचीही अशीच अवस्था झालेली आहे. मागच्या १० वर्षांमधील एकमेव कामगिरी म्हणजे परीक्षा माफियांचा झालेला जन्म हीच आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.   

टॅग्स :lok sabhaलोकसभाAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीfaizabad-pcफैजाबादAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर