शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 19:46 IST

केंद्र सरकारने वक्फ बोर्डातील अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदेत सुधारणा विधेयक आणण्याची तयारी केल्याचं सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली - वक्फ बोर्ड कायद्यात ४० पेक्षा अधिक दुरुस्ती करण्यात येऊ शकते. या दुरुस्ती विधेयकावर सध्या काँग्रेसनं मौन बाळगलं आहे परंतु इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी विरोध केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं वक्फ बोर्डाच्या कामाचं समर्थन केले आहे. वक्फ बोर्ड अनेक शिक्षण संस्था, अनाथलय चालवतं असं त्यांनी म्हटलं तर संसदेत २ समाजात विभागणी होईल अशी कुठलीही चर्चा नको असं मत राष्ट्रीय जनता दलाने मांडले आहे. 

८ डिसेंबर २०२३ रोजी, वक्फ बोर्ड (अधिनियम) कायदा १९९५ रद्द करण्यासाठी एक खाजगी विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. हे विधेयक उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी मांडले. राज्यसभेत हे विधेयक मांडताना वाद झाला आणि हे विधेयक सभागृहात मांडण्यासाठी मतदानही झाले. त्यानंतर ५३ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या समर्थनार्थ मतदान केले तर ३२ सदस्यांनी विरोधात मतदान केले.

भाजपाची भूमिका काय?

हे विधेयक सादर करताना भाजपा खासदार म्हणाले होते की, वक्फ बोर्ड अधिनियम १९९५ हा समाजात द्वेष आणि फूट पाडत आहे. बोर्डाकडून त्यांच्याकडील अधिकारांचा गैरवापर केला जातो. समाजातील एकतेला छेद देतो. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून सरकारी, खासगी संपत्ती तसेच मठ, मंदिर यांच्यावरही मनमानीरित्या कब्जा करते. इतकेच नाही तर हा कायदा पीडितांना त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कोर्टात जाण्यापासूनही रोखतो असं खासदाराने म्हटलं होते. 

काँग्रेसनं राज्यसभेत केली होती मतविभागणीची मागणी

राज्यसभेत अनेक खासदारांनी या खासगी विधेयकाचा विरोध केला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी यावर मतविभागणीची मागणी केली. माकपानेही विधेयकाचा विरोध केला होता. हा एक संवेदनशील विषय असून समाजातील २ गटांमध्ये द्वेष पसरवू शकतो. त्यामुळे हे विधेयक संसदेत सादर करण्याची परवानगी द्यायला नको असं माकपा खासदार इलामारम करीम यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने वक्फ अधिनियममध्ये ४० पेक्षा अधिक सुधारणांवर चर्चा झाली आहे. सूत्रांनुसार, यात वक्फ बोर्डाच्या अधिकाराची पडताळणी करण्याचीही दुरुस्ती आहे. कायद्यातील अनेक तरतुदी या मनमानीरित्या वापरल्या जातात. आता केंद्र सरकारकडून या अधिकारांवर काही निर्बंध आणण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्डाच्या काही अधिकारांवर केंद्र सरकार नियंत्रण ठेवू इच्छिते. संसदेत सोमवारी हे वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयक आणलं जाऊ शकते असं बोललं जात आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी