शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

'संसदेत घुसखोरी झाली, तेव्हा भाजपा खासदार पळून गेले', राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:49 IST

खासदारांच्या निलंबनाविरोधात आज INDIA आघाडीने दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने केली.

Parliament Security Breach Congress Protest ( Marathi News ) : संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले, पण खासदारांच्या निलंबनावरुन संघर्ष सुरुच आहे. या विरोधी India आघाडी आज देशभरात निषेध करत आहे. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर ( Jantar-Mantar ) येथे मुख्य निदर्शने करण्यात आली. सर्व विरोधी पक्षांचे नेत्यांनी एकत्र येत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

देशात तीव्र बेरोजगारीसंसद सुरक्षेतील त्रुटीचा ( Parliament Security Breach ) मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, 'हा मुद्दा संसदेच्या सुरक्षेचा आहे, पण त्या तरुणांनी हे कृत्य का केले? याचे कारण बेरोजगारी आहे. देशात तीव्र बेरोजगारी आहे, त्यामुळे तरुणांना रोजगार मिळू शकत नाहीय. मी एक छोटासा सर्व्हे करायला सांगितला होता. भारतीय तरुण दिवसातील किती तास मोबाईल फोनवर घालवतात, ते शोधण्यास सांगितले होते. यातून असे समजले की, देशातील तरुण दिवसाचे साडेसात तास फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, मेल, म्हणजे स्मार्टफोनवर घालवतोय. याचा अर्थ मोदी सरकारच्या काळात त्यांना रोजगार मिळालाच नाही. यामुळे त्या तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला.'

संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारला घेरलेखासदारांच्या निलंबनाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी दोन-तीन तरुणांनी संसद भवनात उड्या मारल्या, आम्ही सर्वांनी त्यांना उडी मारताना पाहिले. ते आत आले, धुराच्या नळकांड्या फोडल्या, यावेळी भाजपचे सर्व खासदार पळून गेले. जे स्वतःला देशभक्त म्हणवतात, त्यांची हवा टाईट झाली.'

'त्या तरुणांनी संसदेत इतके मोठे कृत्य करणाचे कारण देशातील बेरोजगारी आहे. याबाबत आम्ही गृहमंत्र्यांशी प्रश्न विचारला, तर त्यांनी दीडशे खासदारांची हकालपट्टी केली. प्रत्येक खासदार लाखो मते घेऊन येतो, तुम्ही 150 लोकांचा अपमान केला नाही, तर 60 टक्के भारतातील लोकांना गप्प केले. तुम्ही अग्निवीर योजना आणली आणि तरुणांच्या मनातून देशभक्तीची भावना निघून गेली. अग्निवीरच्या विरोधात तरुण उभे राहिले, तेव्हा सरकारी नोकरी मिळणार नाही, असा दम दिला. आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेम यांच्यात आहे. आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडतोय. तुम्ही जितकं लोकांना घाबरवाल, तितकी इंडिया आघाडी मजबूत होईल,' असंही राहुल यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी