शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:56 IST

Parliament Monsoon Session: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरुन काँग्रेसमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याचे दिसत येत आहे.

Parliament Monsoon Session: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. मोदी सरकार आणि भाजपला कोंडीत पकडण्याची एकही ते संधी सोडत नाहीत. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला आणि भारताची अर्थव्यवस्था 'मृत' असल्याची टीका केली. राहुल गांधींनी त्या टीकेचे समर्थन केले आणि सरकारविरोधात मोठा जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे काही नेते त्यांना घरचा आहेर देत आहेत.

ट्रम्प यांच्याच सुरात सुर मिशळत राहुल गांधी म्हणाले की, "हो, हे खरं आहे. भारताची अर्थव्यवस्था मृत आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना हे माहित आहे. अदानींना मदत करण्यासाठी मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे." अशाप्रकारे राहुल गांधी मोदी सरकारविरुद्ध राजकीय अजेंडा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर आणि राजीव शुक्ला यांच्या विधानांकडे पाहिले, तर ते राहुल गांधींच्या विधानाच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसते. राहुल गांधी ट्रम्प यांच्या दाव्याचे समर्थन करतात, तर थरूर, तिवारी आणि शुक्ला वेगळी भूमिका मांडत आहेत. 

काय म्हणाले तिवारी, शुक्ला आणि थरूर ?

मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची राहुल गांधींची रणनीती भाजपने नव्हे तर काँग्रेसनेच हाणून पाडली आहे. ज्या दिवशी राहुल गांधींनी मृत अर्थव्यवस्थेबद्दल ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केले, त्या दिवशी काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विचार खोडून काढले आणि ते चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मृत नाही. देशातील आर्थिक सुधारणा पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झाल्या. अटलबिहारी वाजपेयींनी त्या सुधारणा पुढे नेल्या आणि मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्या मजबूत केल्या. सध्याच्या केंद्र सरकारनेही यावर काम केले आहे. आपली आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था अजिबात मृत नाही. अमेरिका ही आपल्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. सध्या व्यापार चर्चा सुरू आहेत. कर कमी होण्याची शक्यता आहे. जर असे झाले नाही, तर आपल्या निर्यातीला निश्चितच फटका बसेल. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी म्हणाले की, हे स्वावलंबी भारताची ताकद दर्शवते. सर्व भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा पुरावा आहे, जी नेहरूंच्या अलिप्ततेपासून सुरू झाली आणि आता पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारताच्या विचारसरणीचा भाग आहे.

राहुल गांधींचा डाव उधळला

राजीव शुक्ला, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि मृत अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. एकीकडे राहुल गांधी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शुक्ला, थरूर आणि तिवारी यांचे विधान देशाच्या आर्थिक परिस्थितीवरील राहुल गांधींच्या विधानांच्या पूर्ण विरुद्ध आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदी