शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:56 IST

Parliament Monsoon Session: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरुन काँग्रेसमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याचे दिसत येत आहे.

Parliament Monsoon Session: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. मोदी सरकार आणि भाजपला कोंडीत पकडण्याची एकही ते संधी सोडत नाहीत. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला आणि भारताची अर्थव्यवस्था 'मृत' असल्याची टीका केली. राहुल गांधींनी त्या टीकेचे समर्थन केले आणि सरकारविरोधात मोठा जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे काही नेते त्यांना घरचा आहेर देत आहेत.

ट्रम्प यांच्याच सुरात सुर मिशळत राहुल गांधी म्हणाले की, "हो, हे खरं आहे. भारताची अर्थव्यवस्था मृत आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना हे माहित आहे. अदानींना मदत करण्यासाठी मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे." अशाप्रकारे राहुल गांधी मोदी सरकारविरुद्ध राजकीय अजेंडा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर आणि राजीव शुक्ला यांच्या विधानांकडे पाहिले, तर ते राहुल गांधींच्या विधानाच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसते. राहुल गांधी ट्रम्प यांच्या दाव्याचे समर्थन करतात, तर थरूर, तिवारी आणि शुक्ला वेगळी भूमिका मांडत आहेत. 

काय म्हणाले तिवारी, शुक्ला आणि थरूर ?

मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची राहुल गांधींची रणनीती भाजपने नव्हे तर काँग्रेसनेच हाणून पाडली आहे. ज्या दिवशी राहुल गांधींनी मृत अर्थव्यवस्थेबद्दल ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केले, त्या दिवशी काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विचार खोडून काढले आणि ते चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मृत नाही. देशातील आर्थिक सुधारणा पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झाल्या. अटलबिहारी वाजपेयींनी त्या सुधारणा पुढे नेल्या आणि मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्या मजबूत केल्या. सध्याच्या केंद्र सरकारनेही यावर काम केले आहे. आपली आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था अजिबात मृत नाही. अमेरिका ही आपल्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. सध्या व्यापार चर्चा सुरू आहेत. कर कमी होण्याची शक्यता आहे. जर असे झाले नाही, तर आपल्या निर्यातीला निश्चितच फटका बसेल. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी म्हणाले की, हे स्वावलंबी भारताची ताकद दर्शवते. सर्व भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा पुरावा आहे, जी नेहरूंच्या अलिप्ततेपासून सुरू झाली आणि आता पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारताच्या विचारसरणीचा भाग आहे.

राहुल गांधींचा डाव उधळला

राजीव शुक्ला, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि मृत अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. एकीकडे राहुल गांधी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शुक्ला, थरूर आणि तिवारी यांचे विधान देशाच्या आर्थिक परिस्थितीवरील राहुल गांधींच्या विधानांच्या पूर्ण विरुद्ध आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदी