शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Parliament Monsoon Session: केंद्रात जवळपास ९.७९ लाख जागा रिक्त, केंद्रीय मंत्री म्हणाले...दीड वर्षात १० लाख जागा भरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:49 IST

केंद्र सरकारनं लोकसभेत बुधवारी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२१ च्या स्थितीनुसार केंद्रात विविध विभागांमध्ये जवळपास ९.७९ लाख पदं रिक्त आहेत.

नवी दिल्ली-

केंद्र सरकारनं लोकसभेत बुधवारी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२१ च्या स्थितीनुसार केंद्रात विविध विभागांमध्ये जवळपास ९.७९ लाख पदं रिक्त आहेत. तर एकूण स्वीकृत पदांची संख्या ४०.३५ लाख इतकी आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सविस्तर माहिती दिली. 

खर्च विभागाच्या पेमेंट रिसर्च युनिटच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत 40,35,202 मंजूर पदे होती. रिपोर्टनुसार केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सध्या 30,55,876 कर्मचारी आहेत. 

"केंद्र सरकारमध्ये विविध रिक्त पदांवर भरती करणं हे संबंधित मंत्रालय आणि विभागांची जबाबदारी आहे. ही एक नियमीत चालवली जाणारी प्रक्रिया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेक विभागांमध्ये तसंच मंत्रालयांमध्ये पुढील दीड वर्षात मिशन मोड अंतर्गत १० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं सांगितलं आहे", असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. 

केंद्रातील सर्व विभागांमध्ये ई-कार्यालय प्रणाली लागूसरकारनं बुधवारी लोकसभेत माहिती दिली की केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये डिजिटलायजेशन किंवा ई-कार्यालय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, अर्थ मंत्रालय, न्याय विभाग, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय आणि प्रशासनिक सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागासह अनेक विभागांमध्ये नागरिकांना त्यांचे अर्ज तसंच तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती सिंह यांनी दिली. "डिजिटल सचिवालयाअंतर्गत भारत सरकार सर्व मंत्रालयातील विभागांमध्ये ई-कार्यालय प्रणाली लागू करण्यात आली आहे. मंत्रालयांमध्ये केंद्रीय रजिस्ट्रीचं काम देखील डिजिटल करण्यात आलं आहे", असं सिंह म्हणाले. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदी