शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

पलानीस्वामी सरकार अडचणीत? दिनकरन समर्थक आमदारांनी पाठिंबा काढला, 17 आमदारांची पुदुच्चेरीला रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 17:50 IST

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतचे नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट काल एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

चेन्नई, दि. 22 - माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतचे नवनवे अंक सादर होत आहेत. माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे गट काल एकत्र आल्यानंतर आता दिनकरन यांचे समर्थक असलेल्या 19 आमदारांनी पलानीस्वामी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच या आमदारांच्या गटामधील संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे.  दरम्यान, 19 आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सध्या एआएडीएमकेच्या सगळ्या गटांचे मिळून 135 आमदार आहेत. मात्र संभाव्य फोडाफोडीमुळे पलानीस्वामी यांची खुर्ची डळमळीत झाली आहे.  दिनकरन समर्थक असलेल्या 17 आमदारांना पुदुच्चेरीमधील रिसॉर्टवर पाठवण्यात आले आहे. ज्याप्रमाणे गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले होते. त्याचप्रमाणे दिनकरन यांच्या समर्थकांनी ही खबरदारी घेतली आहे. आता राज्यातील राजकारणाच्या वर्तमान स्थितीबाबत मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनिरसेल्वम पक्षाच्या मुख्यालयात चर्चा करत आहेत. राज्यातील राजकारणाचे बदलते गणित विचारात घेऊन त्वरित विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांनी पत्र लिहून केली आहे.  अधिक वाचासप्टेंबरमध्ये केंद्रात फेररचना? जनता दल .युनायटेड, अण्णा द्रमुक पक्षही सरकारात येणारअण्णा द्रमुकमध्ये मनोमिलन, पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद तथा पक्षाचे समन्वयक पदआम्ही घुसलो तर भारतात अराजकता निर्माण होईल - चीनची धमकीदरम्यान,  अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या गटांचे सोमवारी  विलीनीकरण झाले होते. पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांना पदावरून व पक्षातून दूर करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले आहे. समझोत्याचा भाग म्हणून पक्षाचे समन्वयक म्हणून पनीरसेल्वम यांना नेमण्यात आले असून, मुख्यमंत्री उपसमन्वयक असतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.   माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाचा ताबा घेतल्यामुळे आणि पनीरसेल्वम यांना दूर करून पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली होती. पण आता  शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असणार नाही.     पनिसेल्वम आणि पलानीस्वामी यांचे गट एकत्र यावेत, यासाठी भाजपाने खूपच रस दाखवला होता. त्यामुळे या एकीकरणाचा भाजपाला अधिक आनंद झाला आहे. विलीनीकरण आजच व्हावे, यासाठीही भाजपाने दबाव आणला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी चेन्नईला जाण्यापूर्वी हे गट एकत्र यावेत, अशी भाजपाची इच्छा होती.तसेच पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांनी एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. आजही दोन्ही गट एकत्र आल्यावर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तामिळनाडूमध्ये एकत्रित अण्णा द्रमुकशी समझोता करून ताकद वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :IndiaभारतBJPभाजपा