शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:15 IST

बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर...!

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे प्रश्न व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, जर सिंधू पाणी करारावरील स्थगिती उठवली गेली नाही तर, पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी पोकळ धमकीही दिली आहे.'एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्रातील वृत्तानुसार, पाश्चात्य देशांच्या दोऱ्यावर संसदीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या बिलावर यांनी रविवारी (15 जून, 2025) ब्रसेल्स दौऱ्यादरम्यान जर्मन प्रसारक 'डॉईश वेले उर्दू' ला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे.

बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर, ते त्यांच्या हिताचे ठरणार नाही. पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या भारताच्या कोणताही प्रयत्नाकडे अस्तित्वाला धोका म्हणून पाहिले जाईल. परिणामी, पाकिस्तानला युद्धाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

पीपीपी अध्यक्ष म्हणाले, पाकिस्तानला युद्ध नको आहे. परंतु तो राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा पाण्याच्या हक्कांशी तडजोड करणार नाही. पाकिस्तान शांततेचा पुरस्कार करत राहील, मात्र पाणी सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.

एक दिवस आधीच, बिलावल भुट्टो झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी, भारताने स्पष्ट केले आहे की, आपण पाकिस्तानसोबत केवळ पीओके (पाकव्याप्त काश्मीर) परत देण्यासंदर्भात आणि दहशतवादासंदर्भातच चर्चा करणार.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणीPOK - pak occupied kashmirपीओके