शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 23:19 IST

Ceasefire Violation: युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून सीमे लगतच्या भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघर्षानंतर आज संध्याकाळपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू झाला होता. दरम्यान, या युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर आज भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असं आम्ही आवाहन करत आहोत, असे विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला होता. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकार