शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 23:19 IST

Ceasefire Violation: युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून सीमे लगतच्या भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघर्षानंतर आज संध्याकाळपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू झाला होता. दरम्यान, या युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर आज भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असं आम्ही आवाहन करत आहोत, असे विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला होता. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकार