शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:55 IST

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय शहरे आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे. एलओसीवर पाकिस्तानने आपले ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारी गमावले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत त्यांच्या १२ एअरबेसवर हल्ले झाले, ज्यात पाकिस्तानच्या ५२ पेक्षा अधिक वायुसैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतालाही आठ जवानांचे बलिदान द्यावे लागले आहे.

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. भारतीय लष्करी संचालनालयाच्या (डीजीएमओ) माहितीनुसार, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीमेपलीकडून विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक हवाई दलाच्या धावपट्ट्या, हँगर, एअर डिफेन्स यंत्रणा आणि रडार यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच पाक हवाई दलाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुसैनिक गमवावे लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आतून पूर्णपणे हादरला आहे.

बलौरी एअरबेसवर सर्वाधिक नुकसान

भारतीय हवाई दलाच्या डीजीएमओंनी सांगितले की, सुमारे अर्धा डझन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली. यात त्यांचे पायलटदेखील ठार झाले. सर्वांत मोठे नुकसान सिंध प्रांतातील बलौरी एअरबेसवर झाले. तेथे भारताच्या कारवाईत स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफसह १२ पाक वायुसैनिक ठार झाले. १२ हून अधिक एअरबेसवर हल्ले करण्यात आले, त्याच ठिकाणांहून भारतावर हवाई हल्ले करण्यात येत होते.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक