शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:55 IST

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय शहरे आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे. एलओसीवर पाकिस्तानने आपले ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारी गमावले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत त्यांच्या १२ एअरबेसवर हल्ले झाले, ज्यात पाकिस्तानच्या ५२ पेक्षा अधिक वायुसैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतालाही आठ जवानांचे बलिदान द्यावे लागले आहे.

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. भारतीय लष्करी संचालनालयाच्या (डीजीएमओ) माहितीनुसार, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीमेपलीकडून विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक हवाई दलाच्या धावपट्ट्या, हँगर, एअर डिफेन्स यंत्रणा आणि रडार यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच पाक हवाई दलाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुसैनिक गमवावे लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आतून पूर्णपणे हादरला आहे.

बलौरी एअरबेसवर सर्वाधिक नुकसान

भारतीय हवाई दलाच्या डीजीएमओंनी सांगितले की, सुमारे अर्धा डझन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली. यात त्यांचे पायलटदेखील ठार झाले. सर्वांत मोठे नुकसान सिंध प्रांतातील बलौरी एअरबेसवर झाले. तेथे भारताच्या कारवाईत स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफसह १२ पाक वायुसैनिक ठार झाले. १२ हून अधिक एअरबेसवर हल्ले करण्यात आले, त्याच ठिकाणांहून भारतावर हवाई हल्ले करण्यात येत होते.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक