शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 02:55 IST

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय शहरे आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे. एलओसीवर पाकिस्तानने आपले ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारी गमावले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत त्यांच्या १२ एअरबेसवर हल्ले झाले, ज्यात पाकिस्तानच्या ५२ पेक्षा अधिक वायुसैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतालाही आठ जवानांचे बलिदान द्यावे लागले आहे.

पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. भारतीय लष्करी संचालनालयाच्या (डीजीएमओ) माहितीनुसार, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सीमेपलीकडून विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक हवाई दलाच्या धावपट्ट्या, हँगर, एअर डिफेन्स यंत्रणा आणि रडार यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच पाक हवाई दलाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुसैनिक गमवावे लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आतून पूर्णपणे हादरला आहे.

बलौरी एअरबेसवर सर्वाधिक नुकसान

भारतीय हवाई दलाच्या डीजीएमओंनी सांगितले की, सुमारे अर्धा डझन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली. यात त्यांचे पायलटदेखील ठार झाले. सर्वांत मोठे नुकसान सिंध प्रांतातील बलौरी एअरबेसवर झाले. तेथे भारताच्या कारवाईत स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफसह १२ पाक वायुसैनिक ठार झाले. १२ हून अधिक एअरबेसवर हल्ले करण्यात आले, त्याच ठिकाणांहून भारतावर हवाई हल्ले करण्यात येत होते.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक