शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"अवैधपणे कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करा..."; भारताने पाकिस्तानला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:40 IST

खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत केलेल्या विधानानं पाकला मिरची झोंबली आहे. मोदींचे विधान एकतर्फी असून दिशाभूल करणारे असल्याची प्रतिक्रिया पाकिस्ताननं एक दिवसाआधी दिली. त्यावरून आता भारतानेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत भारताच्या भागावरील अवैध कब्जा रिकामा करा असा इशारा दिला आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी अधिकृतपणे निवेदन जारी करत म्हटलंय की, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेत पाकिस्तान सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानने अवैध आणि बळजबरीनं कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करावा. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील जम्मू काश्मीर राज्याबाबत काही टिप्पणी केल्याचं ऐकलं. खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे असं त्यांनी सांगितले.

भारताची प्रतिक्रिया अशावेळी आली आहे जेव्हा अमेरिकन इंटेलिजेंस चीफ तुलसी गबार्ड यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानी पुरस्कृत हल्ल्यावरील प्रश्नाला उत्तर दिले. इस्लामिक दहशतवाद हा असा धोका आहे, ज्याने भारत आणि अमेरिकेसह मध्य पूर्व देशातील अनेकांचे नुकसान केले आहे असं गबार्ड यांनी म्हटलं. तुलसी गबार्ड यांच्या मुलाखतीत मोदींनीही भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि सागरी, सायबर सुरक्षेसाठी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगितले. 

काय होता पाकिस्तानचा आरोप?

पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान एकतर्फी असल्याचं म्हणत जम्मू काश्मीर वादग्रस्त मुद्दा असल्याचं म्हटलं. जम्मू काश्मीरचा ७ दशकाचा जुना वाद भारताच्या संयुक्त राष्ट्र, पाकिस्तान आणि काश्मिरी लोकांना दिलेल्या आश्वासनानंतरही सोडवला गेला नाही असा आरोप त्यांनी केला. 

नरेंद्र मोदींनी मुलाखतीत काय म्हटलं?

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. त्यात भारत पाकिस्तान संबंधांवर मोदींनी पाकला फटकारले. भारताकडून शांततेसाठी करण्यात आलेला प्रत्येक प्रयत्न शत्रुता आणि विश्वासघाताने अयशस्वी केला. कुठेही दहशतवादी हल्ला झाला तरी त्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले जातात. भारत शांततेसाठी वचनबद्ध आहे. पाकिस्तानला सुबुद्धी मिळेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानातील लोकांनाही शांतता हवी, कारण तेदेखील संघर्ष, अशांतता आणि दहशतीच्या वातावरणाला कंटाळले आहेत असं मोदींनी म्हटलं होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर