शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:40 IST

युद्धात पराभव झाला असतानाही आपला विजय झाल्याचे ढोल वाजविणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: युद्धात पराभव झाला असतानाही आपला विजय झाल्याचे ढोल वाजविणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आता जगासमोर आलेले नवे वास्तव स्वीकारणे हे पाकिस्तानच्याच भल्याचे ठरणार आहे, असे भारताने मंगळवारी ठणकावले आहे. पाकिस्तानने काश्मीरचा बळकाविलेला भूभाग भारताला परत करावा ही आमची मागणी असून त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही भारताने बजावले.

भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, काश्मीरच्या प्रश्नावर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढावा, अशी भारताची भूमिका आहे. त्यात बदल झालेला नाही. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा नवा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला. त्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी हे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, अण्वस्त्र हल्ल्यांच्या दिल्या जाणाऱ्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. अशा धमक्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायादेखील भारत सहन करणार नाही.

त्या कालावधीत अमेरिकेशी व्यापार चर्चा झालीच नाही

ऑपरेशन सिंदूरला ७ मे रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० मे रोजी भारत व पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. या कालावधीत भारत व अमेरिकेत लष्करी कारवाई, व संबंधित विषयांवर चर्चा झाली. मात्र, व्यापाराचा विषय कधीच उपस्थित करण्यात आला नाही, असे जयस्वाल म्हणाले. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण कायम ठेवेल तोवर सिंधू जल कराराला भारताने दिलेली स्थगितीही कायम राहील.

हा तर भारताचा स्पष्ट विजय : कूपर

ऑस्ट्रियन लष्करी इतिहासकार टॉम कूपर यांनी ऑपरेशन सिंदूर कारवाई म्हणजे भारताचा स्पष्ट विजय आहे, असे म्हटले आहे. भारत-पाक संघर्षाचे विश्लेषण करताना कूपर यांनी ब्लॉग पोस्टमध्ये पाश्चात्य माध्यमांवर टीका केली. आपण जेव्हा दुसऱ्याच्या अण्वस्त्र साठवणुकीच्या सुविधांवर बॉम्बस्फोट करीत असतो आणि दुसऱ्या बाजूकडे प्रत्युत्तर देण्याचीही क्षमता नसते, हा माझ्या लेखी स्पष्ट विजय आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPOK - pak occupied kashmirपीओकेIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक