शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पाक कधीच करारांचे पालन करत नाही; कुंपण, कारगिल युद्ध व ताज्या शस्त्रसंधी कराराचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:23 IST

एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत. 

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तान व भारतात शस्त्रसंधी केल्याला एकच रात्र उलटली असली तरी आजवर भारतीय जनता त्या देशाच्या मौखिक समझोत्याबाबत साशंक आहे. कारण इतिहासात पाकने मौखिक किंवा लिखित कोणत्याच समझोत्याचे कधीही पालन केलेले नाही. त्याच कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्याही युद्धाच्या तयारीत कोणतीही कमी झालेली नाही.

एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत. 

१९९९ : कारगिल युद्ध होण्यापूर्वी कोणताच देश भीषण थंडीतील बर्फवृष्टी व हवामानाच्या स्थितीमुळे रिकाम्या होणाऱ्या चौकीवर ताबा मिळविणार नाही, असा समझोता होता; परंतु पाकच्या सैन्याने असा समझोता कधीही मानलाच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कारगिल युद्ध झाले. 

१९८४ : एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याला जगातील सर्वांत दुर्गम व उंच युद्धस्थळ सियाचीन ग्लेशियरवरही याचमुळे तळ ठोकावा लागला. कारण पाकने समझोत्यांचे उल्लंघन करत याच्या अनेक भागांवर आपले सैन्य पाठवण्यास प्रारंभ केला होता. याच कारणामुळे भारताने १९९९ च्या कारगिल युद्धानंतर एलओसीवरील कोणतीही दुर्गम सीमा चौकी भीषण थंडीच्या काळातही रिकामी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आजही कारगिलच्या दुर्गम पर्वतराजींमध्ये शून्य ते ४० अंशांच्या तापमानातही सैन्याचे जवान पाकिस्तानी लष्कराच्या समोर निधड्या छातीने उभे असतात. 

१९९५ : जम्मू सीमेवर तारांचे कुंपण घालण्यास सुरुवात झाली तेव्हा पाक रेंजर्सनी अर्ध्या तासांतच समझोता तोडून गोळीबार करण्यास बीएसएफला मजबूर केले होते. त्यामुळे पाकला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. कुंपण घालण्याच्या कालावधीत कितीदा तरी पाक रेंजर्स व पाक सैन्याने मौखिक व लिखित समझोता तोडला होता, याची गणती करणेही अवघड आहे. 

२०२५ : आता ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भयानक नुकसान झाल्यानंतर पाकशी झालेली युद्धबंदी किती दिवस टिकेल, याची शंका सर्वांच आहे कारण काल रात्रीच तीन तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर