शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाक कधीच करारांचे पालन करत नाही; कुंपण, कारगिल युद्ध व ताज्या शस्त्रसंधी कराराचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:23 IST

एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत. 

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तान व भारतात शस्त्रसंधी केल्याला एकच रात्र उलटली असली तरी आजवर भारतीय जनता त्या देशाच्या मौखिक समझोत्याबाबत साशंक आहे. कारण इतिहासात पाकने मौखिक किंवा लिखित कोणत्याच समझोत्याचे कधीही पालन केलेले नाही. त्याच कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्याही युद्धाच्या तयारीत कोणतीही कमी झालेली नाही.

एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत. 

१९९९ : कारगिल युद्ध होण्यापूर्वी कोणताच देश भीषण थंडीतील बर्फवृष्टी व हवामानाच्या स्थितीमुळे रिकाम्या होणाऱ्या चौकीवर ताबा मिळविणार नाही, असा समझोता होता; परंतु पाकच्या सैन्याने असा समझोता कधीही मानलाच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कारगिल युद्ध झाले. 

१९८४ : एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याला जगातील सर्वांत दुर्गम व उंच युद्धस्थळ सियाचीन ग्लेशियरवरही याचमुळे तळ ठोकावा लागला. कारण पाकने समझोत्यांचे उल्लंघन करत याच्या अनेक भागांवर आपले सैन्य पाठवण्यास प्रारंभ केला होता. याच कारणामुळे भारताने १९९९ च्या कारगिल युद्धानंतर एलओसीवरील कोणतीही दुर्गम सीमा चौकी भीषण थंडीच्या काळातही रिकामी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आजही कारगिलच्या दुर्गम पर्वतराजींमध्ये शून्य ते ४० अंशांच्या तापमानातही सैन्याचे जवान पाकिस्तानी लष्कराच्या समोर निधड्या छातीने उभे असतात. 

१९९५ : जम्मू सीमेवर तारांचे कुंपण घालण्यास सुरुवात झाली तेव्हा पाक रेंजर्सनी अर्ध्या तासांतच समझोता तोडून गोळीबार करण्यास बीएसएफला मजबूर केले होते. त्यामुळे पाकला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. कुंपण घालण्याच्या कालावधीत कितीदा तरी पाक रेंजर्स व पाक सैन्याने मौखिक व लिखित समझोता तोडला होता, याची गणती करणेही अवघड आहे. 

२०२५ : आता ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भयानक नुकसान झाल्यानंतर पाकशी झालेली युद्धबंदी किती दिवस टिकेल, याची शंका सर्वांच आहे कारण काल रात्रीच तीन तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर