शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
4
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
5
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
6
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
7
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
8
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
9
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
10
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
11
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
12
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
13
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
14
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
15
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
16
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
17
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
18
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
19
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
20
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:54 IST

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका डच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर मध्यस्थी केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचा परस्पर संपर्क झाला आणि त्यातूनच युद्धविरामाची चर्चा झाली. अमेरिकेचा मध्यस्थीचा दावा खोटा असून, दोन्ही देशांमधील परिस्थिती दोहोंच्या संवादातूनच निवळली, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम येथील हल्ल्याचे उद्दिष्ट धार्मिक उन्माद पसरवणे होते, असे जयशंकर यांनी नमूद केले. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, "आम्ही या काळात अमेरिकेसह इतर अनेक देशांशी संपर्कात होतो, पण भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय पाकिस्तानसोबत थेट संवाद साधला."

पाकिस्तानने स्वतःच युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला!पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती. यानंतरच संघर्ष थांबला आणि सीमारेषेवर तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली.

मी व्यवसायाद्वारे भारत-पाक तणाव कमी केला : ट्रम्पदरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव व्यवसाय आणि संवादाच्या माध्यमातून कमी केला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवादादरम्यान ट्रम्प म्हणाले, "मी भारतासोबत खूप काम केलं, पाकिस्तानसोबतही काम केलं. आम्ही त्यांच्याशी बोललो आणि युद्धविराम घडवून आणला. पाकिस्तानमध्ये काही अद्भुत लोक आहेत, चांगले नेते आहेत, आणि भारतही माझा चांगला मित्र आहे."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला