शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:01 IST

Loksabha Election - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पीओकेवरील विधानावर पलटवार करताना फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

श्रीनगर -Farooq abdullah on Pakistan ( Marathi News ) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संवाद, कारण कुठल्याही हिंसक कृत्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या लोकांवर होतील. पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी पीओके भारताच्या ताब्यात घेऊ असं वक्तव्य केले होते. त्यावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांना असं करण्यापासून कुणी रोखणारं नाही. त्यांनी तसं करू द्या, त्यांना रोखणार कोण? तसेही ते आम्हाला विचारत नाहीत. परंतु लक्षात ठेवा, पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत. दुर्दैव हेच असेल की ते अणुबॉम्ब आमच्यावर डागतील असं त्यांनी सांगितले.

तसेच युद्धाशिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे चर्चा, संवाद...केंद्र सरकार चीनसोबत १९ वेळा चर्चा करू शकते. चीननं आपल्या हजारो एकर जमिनीवर कब्जा केला आहे. चीन भारतासमोर झुकत नाही. तो सातत्याने पुढे सरकत आहे. मग केंद्र सरकार पाकिस्तानशी संवाद का करू शकत नाही जेणेकरून येथील रक्तपात थांबेल आणि आम्ही शांतीने राहू शकू असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.

दरम्यान, आपले सैनिक दरदिवशी शहीद होतात पण केंद्र गप्प राहते. अनंतनागच्या राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात १ जवान शहीद झाला तर ४ जखमी आहेत. दहशतवाद आहे की नाही यावर अमित शाह यांनी उत्तर दिले पाहिजे. दहशतवादासाठी कलम ३७० जबाबदार धरलं जात होते, आता ते कलम हटवलं तरीही दहशतवाद आहे की नाही हे गृहमंत्र्यांनी सांगावे असा टोलाही फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला लगावला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४