शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:01 IST

Loksabha Election - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पीओकेवरील विधानावर पलटवार करताना फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

श्रीनगर -Farooq abdullah on Pakistan ( Marathi News ) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संवाद, कारण कुठल्याही हिंसक कृत्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या लोकांवर होतील. पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी पीओके भारताच्या ताब्यात घेऊ असं वक्तव्य केले होते. त्यावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांना असं करण्यापासून कुणी रोखणारं नाही. त्यांनी तसं करू द्या, त्यांना रोखणार कोण? तसेही ते आम्हाला विचारत नाहीत. परंतु लक्षात ठेवा, पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत. दुर्दैव हेच असेल की ते अणुबॉम्ब आमच्यावर डागतील असं त्यांनी सांगितले.

तसेच युद्धाशिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे चर्चा, संवाद...केंद्र सरकार चीनसोबत १९ वेळा चर्चा करू शकते. चीननं आपल्या हजारो एकर जमिनीवर कब्जा केला आहे. चीन भारतासमोर झुकत नाही. तो सातत्याने पुढे सरकत आहे. मग केंद्र सरकार पाकिस्तानशी संवाद का करू शकत नाही जेणेकरून येथील रक्तपात थांबेल आणि आम्ही शांतीने राहू शकू असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.

दरम्यान, आपले सैनिक दरदिवशी शहीद होतात पण केंद्र गप्प राहते. अनंतनागच्या राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात १ जवान शहीद झाला तर ४ जखमी आहेत. दहशतवाद आहे की नाही यावर अमित शाह यांनी उत्तर दिले पाहिजे. दहशतवादासाठी कलम ३७० जबाबदार धरलं जात होते, आता ते कलम हटवलं तरीही दहशतवाद आहे की नाही हे गृहमंत्र्यांनी सांगावे असा टोलाही फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला लगावला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४