शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

स्थलांतरित मजुरांच्या वेदना शब्दातीत; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:43 AM

कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाने गरीब आणि मजुरांना मोठा फटका बसला असून त्यांच्या वेदना शब्दांत सांगता येणाऱ्या नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

मोदी त्यांच्या दर महिन्याच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात रविवारी म्हणाले की, ‘‘कोविड-१९ महामारीचा फटका सगळ्या थरांतील लोकांना बसला; परंतु गरीब त्यात कमालीचे भरडून निघाले. आमची खेडी, गावे, जिल्हे आणि राज्ये स्वावलंबी असती तर आज आम्ही ज्या प्रमाणात प्रश्नांना तोंड देत आहोत तेवढी वेळ आली नसती.’’ गरीब, मजुरांना मदत करण्यासाठी प्रत्येक जण काम करीत आहे, असे सांगून मोदी यांनी रेल्वेने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे जे काम केले त्याचा आवर्जून उल्लेख केला.

कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही. या अरिष्टाचा यापूर्वी अनुभवही नाही. आम्ही अगदीच नव्या आव्हानांना आणि त्यातून येणाºया कठीण स्थितीला तोंड देत आहोत, असे मोदी म्हणाले. सगळे देश कोरोना विषाणूमुळे ज्या प्रश्नांना तोंड देत आहेत तसेच भारताबाबतही आहे. देशातील एकही भाग असा नाही की ज्याला कोरोनामुळे त्रास झाला नाही. हा त्रास खूप खोलवर झाला तो कोणतेही संरक्षण नसलेले मजूर आणि कामगारांना. त्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांनी भोगलेली कठीण परिस्थिती ही शब्दांत सांगता येणारी नाही. हे मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आज जे भोगत आहेत ते आम्ही समजून घेऊ शकणार नाही, असे मोदी म्हणाले.

मला सेवा करण्याची संधी या देशाने दिल्यापासून आम्ही पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या काही वर्षांत याबाबत बरेच काम झाले आहे व त्याचे मला खूप समाधान आहे आणि आता स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्या उत्तराची गरज आहे आम्ही त्या दिशेने अथकपणे काम करीत आहोत, असे मोदी म्हणाले.मजूर, कामगारांमधील कौशल्येही शोधली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी