शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:10 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच केंद्र सरकारनेही या दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारच्या इमिग्रेशन विभागाकडून भारतात वास्तव्य करून असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती मागवण्यात आली आहे. ४८ तासांच्या मुदतीनंतर भारतात राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पकडून माघारी पाठवण्याची कारवाई सुरू होईल. पाकिस्तानी नागरिकांना माघारी धाडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा पुढच्या ४८ तासांपर्यंत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष ठेवतील.

या संदर्भात अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या भारतात किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते कुठे आहेत, याबाबत इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांची नोंदणी करणाऱ्या कार्यालयांकडे विचारणा करण्यात आली आहे. नियमांनुसार पाकिस्तानी नागरिकांना अटारी बॉर्डर,  रेल्वे स्टेशन आणि विमान तळांवरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे आपली माहिती नोंदवावी लागेल. त्यामध्ये त्यांचं वास्तव्य असलेला पत्ताही द्यावा लागेल. सर्व इमिग्रेशन कार्यालये आज संध्याकाळपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सोपवतील. त्यामध्ये किती नागरिक भारतामध्ये आहेत आणि किती माघारी परतले आहेत, याची माहिती दिली जाईल.

४८ तासांची मुदत ओलांडल्यानंतरही भारतात वास्तव्य करून राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश त्यांचं वास्तव्य असलेल्या भागातील स्थानिक पोलिसांना दिले जातील. पोलीस या नागरिकांना ताब्यात घेऊन बसच्या माध्यमातून अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानमध्ये पाठवतील. विशेष परिस्थितीत या नागरिकांना अटक करण्याची तरतूद आहे. मात्र सामान्य परिस्थितीत या अधिकाराचा वापर केला जाणार नाही.

या अधिकाऱ्याने सांगितले की, वैध कागदपत्रांसह भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची इत्यंभूत माहिती केंद्र सरकारकडे आहे. सरकारी आदेशानुसार या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत भारत सोडावा लागेल. पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान