शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:32 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.

Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. पण, आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला सहा प्रश्न विचारले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे, असे त्यात म्हटले आहे. पण, असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे देशातील लोकांना हवी आहेत. 

काँग्रेसने सरकारला विचारले हे 6 प्रश्न

  1. सुरक्षेत चूक कशी झाली?
  2. गुप्तचर यंत्रणा अपयशी का ठरली?
  3. दहशतवादी सीमेवरुन कसे घुसले?
  4. 28 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
  5. गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?
  6. या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेतील का?

28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार ?व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, जर नोटाबंदीने दहशतवाद संपणार होता, तर अशी परिस्थिती कशी निर्माण झाली? 28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री त्यांचे अपयश स्वीकारुन राजीनामा देतील का? पंतप्रधान इतर सर्व गोष्टींचे श्रेय घेतात, त्याप्रमाणे या हल्ल्याची जबाबदारी घेतील का? असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर