शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:32 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.

Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. पण, आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला सहा प्रश्न विचारले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे, असे त्यात म्हटले आहे. पण, असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे देशातील लोकांना हवी आहेत. 

काँग्रेसने सरकारला विचारले हे 6 प्रश्न

  1. सुरक्षेत चूक कशी झाली?
  2. गुप्तचर यंत्रणा अपयशी का ठरली?
  3. दहशतवादी सीमेवरुन कसे घुसले?
  4. 28 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
  5. गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?
  6. या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेतील का?

28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार ?व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, जर नोटाबंदीने दहशतवाद संपणार होता, तर अशी परिस्थिती कशी निर्माण झाली? 28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री त्यांचे अपयश स्वीकारुन राजीनामा देतील का? पंतप्रधान इतर सर्व गोष्टींचे श्रेय घेतात, त्याप्रमाणे या हल्ल्याची जबाबदारी घेतील का? असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर