शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:53 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 24 तासांत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे हा संशय बळावला आहे. असे म्हटले जात आहे की, भारत पूर्वीप्रमाणेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीमापार मोठी मोहीम राबवू शकतो. 2016 आणि 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले. दोन्ही सर्जिकल स्ट्राईकमध्ये 500 हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते.

पाकिस्तानवर कारवाईचे 4 संकेत

1. गृहमंत्री शाह यांची उच्चस्तरीय बैठकदहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा तात्काळ काश्मीर खोऱ्यात पोहोचले. शाह स्वतः या संपूर्ण प्रकरणावर जातीने लक्ष ठेवत असून, घटनास्थळांना भेटी देत आहेत. काश्मीरमध्ये शाहांनी एलजी मनोज सिन्हा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. बैठकीनंतर शाह म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. हा देश दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही.

2. पंतप्रधान मोदी दुसऱ्या मार्गाने आलेपहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. मोदींनी त्यांचा तिथला दौरा रद्द केला आणि लगेच भारतात परतले. अहवालानुसार पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई हद्दीऐवजी दुसऱ्या मार्गाने दिल्लीला आले. मोदींच्या या पावलाकडे पाकिस्तानला थेट इशारा म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान दिल्लीत सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील. सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती ही सर्वोच्च पातळीची समिती आहे. यामध्ये सुरक्षेशी संबंधित प्रमुख निर्णय घेतले जातात.

3. तिन्ही दल सज्ज, संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठकपहलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत तिन्ही लष्कर प्रमुखांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याचाच अर्थ सरकार एखाद्या मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. गेल्या वेळी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

4. पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरणपाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर भारताने हल्ला केला तर येथील सर्व पक्ष एकत्रितपणे त्याचा विरोध करतील, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. फवाद यांच्या आधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले. सॅटेलाईट रिपोर्टनुसार, कालच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमाने रात्रभर पाकिस्तान सीमेभोवती गस्त घालत होती. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान