शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:19 IST

न्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे असा समाचार भाजपा नेत्याने घेतला आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून जोर धरू लागली आहे. सरकारकडूनही पाकविरोधात आक्रमक पावले उचलली जात आहेत. त्यातच छत्तीसगड काँग्रेसचे माजी आमदार यूडी मिंज यांच्या फेसबुक पोस्टने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्याशिवाय बालाकोट एअरस्ट्राईकवरूनही वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपाने काँग्रेस नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर माझं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला. २६ एप्रिलला शेअर केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मिंज यांच्या विधानावरून मुख्यमंत्री विष्णु देव सायचे माध्यम सल्लागार पंकज झा यांनी त्यांना फटाकरले आहे. झा यांनी मिंज यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या पोस्टमध्ये म्हटलंय की, जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाचं बोलतायेत, त्यांना हेदेखील माहिती असावे पाकिस्तानसोबत भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पीओके हा महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे असं त्यांनी म्हटलं.

ग्वादर पोर्ट चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलूचिस्तानच्या बंडखोरांची ताकद चीनी सैनिकांशी लढण्याशी नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सक्रिय आहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे जिथे लश्कर ए तोयबाचं नेटवर्क आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट हल्ला केला तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसोबत उभा राहील, त्याचा विचार करा असंही काँग्रेस नेते मिंज यांनी सांगितले.

दरम्यान, पुन्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे. जर असे लोक कधी देशहिताचं बोलत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि चेहऱ्याच्या हावभावावर समजू शकते. विशेषत: युद्धाच्या परिस्थितीत हे चालता फिरता बॉम्बपेक्षा कमी आहे. जेव्हा कधीही चीनकडून धोका निर्माण झाला तेव्हा काँग्रेसने सरेंडर होण्याची घोषणा केली असं भाजपा नेते पंकज झा यांनी म्हटलं. तर माझे फेसबुक हॅक झाले, मी फेसबुकशी संपर्क साधत सुरक्षेसाठी योग्य ते प्रयत्न करत आहे असं काँग्रेस नेते यूडी मिंज यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपा