शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:19 IST

न्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे असा समाचार भाजपा नेत्याने घेतला आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून जोर धरू लागली आहे. सरकारकडूनही पाकविरोधात आक्रमक पावले उचलली जात आहेत. त्यातच छत्तीसगड काँग्रेसचे माजी आमदार यूडी मिंज यांच्या फेसबुक पोस्टने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्याशिवाय बालाकोट एअरस्ट्राईकवरूनही वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपाने काँग्रेस नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर माझं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला. २६ एप्रिलला शेअर केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मिंज यांच्या विधानावरून मुख्यमंत्री विष्णु देव सायचे माध्यम सल्लागार पंकज झा यांनी त्यांना फटाकरले आहे. झा यांनी मिंज यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या पोस्टमध्ये म्हटलंय की, जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाचं बोलतायेत, त्यांना हेदेखील माहिती असावे पाकिस्तानसोबत भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पीओके हा महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे असं त्यांनी म्हटलं.

ग्वादर पोर्ट चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलूचिस्तानच्या बंडखोरांची ताकद चीनी सैनिकांशी लढण्याशी नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सक्रिय आहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे जिथे लश्कर ए तोयबाचं नेटवर्क आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट हल्ला केला तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसोबत उभा राहील, त्याचा विचार करा असंही काँग्रेस नेते मिंज यांनी सांगितले.

दरम्यान, पुन्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे. जर असे लोक कधी देशहिताचं बोलत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि चेहऱ्याच्या हावभावावर समजू शकते. विशेषत: युद्धाच्या परिस्थितीत हे चालता फिरता बॉम्बपेक्षा कमी आहे. जेव्हा कधीही चीनकडून धोका निर्माण झाला तेव्हा काँग्रेसने सरेंडर होण्याची घोषणा केली असं भाजपा नेते पंकज झा यांनी म्हटलं. तर माझे फेसबुक हॅक झाले, मी फेसबुकशी संपर्क साधत सुरक्षेसाठी योग्य ते प्रयत्न करत आहे असं काँग्रेस नेते यूडी मिंज यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपा