शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:19 IST

न्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे असा समाचार भाजपा नेत्याने घेतला आहे.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून जोर धरू लागली आहे. सरकारकडूनही पाकविरोधात आक्रमक पावले उचलली जात आहेत. त्यातच छत्तीसगड काँग्रेसचे माजी आमदार यूडी मिंज यांच्या फेसबुक पोस्टने नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्याशिवाय बालाकोट एअरस्ट्राईकवरूनही वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपाने काँग्रेस नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर माझं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला. २६ एप्रिलला शेअर केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे. मिंज यांच्या विधानावरून मुख्यमंत्री विष्णु देव सायचे माध्यम सल्लागार पंकज झा यांनी त्यांना फटाकरले आहे. झा यांनी मिंज यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या पोस्टमध्ये म्हटलंय की, जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाचं बोलतायेत, त्यांना हेदेखील माहिती असावे पाकिस्तानसोबत भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पीओके हा महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे असं त्यांनी म्हटलं.

ग्वादर पोर्ट चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलूचिस्तानच्या बंडखोरांची ताकद चीनी सैनिकांशी लढण्याशी नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सक्रिय आहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे जिथे लश्कर ए तोयबाचं नेटवर्क आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट हल्ला केला तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसोबत उभा राहील, त्याचा विचार करा असंही काँग्रेस नेते मिंज यांनी सांगितले.

दरम्यान, पुन्हा एकदा काँग्रेस नेता भारताविरोधात बोललो, हे देशद्रोही विधान आहे. जर असे लोक कधी देशहिताचं बोलत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि चेहऱ्याच्या हावभावावर समजू शकते. विशेषत: युद्धाच्या परिस्थितीत हे चालता फिरता बॉम्बपेक्षा कमी आहे. जेव्हा कधीही चीनकडून धोका निर्माण झाला तेव्हा काँग्रेसने सरेंडर होण्याची घोषणा केली असं भाजपा नेते पंकज झा यांनी म्हटलं. तर माझे फेसबुक हॅक झाले, मी फेसबुकशी संपर्क साधत सुरक्षेसाठी योग्य ते प्रयत्न करत आहे असं काँग्रेस नेते यूडी मिंज यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपा