शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:30 IST

पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबविण्यासाठी, त्यांना पाण्यासाठी भीक मागायची वेळ आणण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. त्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर कराराची स्थगिती टिकवून ठेवण्यासाठी ठाम राहावे लागेल... ही लढाई दीर्घकाळ चालेल...

सुरेश एस. डुग्गर प्रतिनिधी, जम्मू-काश्मीर

भारतानेपाकिस्तानसोबत १९६० पासून सुरू असलेल्या सिंधू जल कराराला 'स्थगित' करण्याची घोषणा केली त्यामुळे भारतीय जनतेत आनंदाचे वातावरण आहे. मात्र या घोषणेमागे एक कट्टु वास्तव दडले आहे - ते म्हणजे पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबविण्यासाठी, त्यांना पाण्यासाठी भीक मागायची वेळ आणण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. सिंधू करार पूर्णपणे मोडला, तरी जम्मू-कश्मीरमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी थांबवणे सहज शक्य नाही. याकरारानुसार ३० टक्के पाणी भारताला आणि ७० टक्के पाकिस्तानला दिले गेले होते. हे सारे नद्यांच्या जलसंधारण क्षेत्रांनुसार जलवाटप ठरवले गेले. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले गेले होते.त्यांच्यासाठी ८० टक्के सिंचन आणि जलपुरवठ्याचे मुख्य स्रोत हेच आहेत. हा करार स्थगित करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, हे फक्त तेव्हाच, जेव्हा भारत पूर्णपणे हे पाणी रोखण्यात यशस्वी होईल. प्रत्यक्षात भारत फक्त आपल्या वाट्याच्या ५-६ टक्के पाण्याचाच वापर करतो. आपला पूर्ण हक्काचा पाणीसाठा वापरण्यासाठी आवश्यक असणारे धरणांचे बांधकाम करणे हे अब्जावधी रुपयांचे गुंतवणुकीचे काम आहे आणि त्यात अनेक वर्षे जातील.हा करार तोडण्याचा अर्थ पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खिळखिळे करणे आहे. पाकिस्तानला हे चांगलेच माहीत आहे की, भारताने केवळ १ टक्का पाणीही रोखले तरी १४ लाख लोकांना शेतीसाठी पाणी मिळणार नाही. दुर्दैवाने काश्मीरची जनता गेली ६५ वर्षे या संधीकडून होणाऱ्या नुकसानीला बळी पडत आहे. काश्मीरमधील कोरडे पडलेले शेत आता आशेने पाहत आहेत.

पाकची आर्थिक कोंडी

१. सिंधू करार पूर्णपणे संपविल्यास पाकिस्तानमध्ये सर्वाधिक परिणाम शेतीवर होईल, पाकिस्तानमधील सुमारे ४७दशलक्ष एकर शेती या नद्यांवर अवलंबून आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे गहू, तांदूळ, ऊस आणि कापसाच्या उत्पादनावर परिणाम होईल, जे अन्नसुरक्षेला धोका ठरू शकते. यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतील आणि आयातीवर अवलंबित्व वाढेल, ज्याचा फटका परकीय चलन साठ्यावर बसेल.

२.पाकिस्तानच्या जीडीपीत शेतीचा वाटा २५ टक्के आहे. त्याचा फटका बसला तर पाकचा जीडीपी कुठे असेल, याचा विचारच न केलेला बरा. वस्त्रउद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रही कोलमडतील. जलविद्युत उत्पादनात घट झाल्यामुळे वीजटंचाई निर्माण होईल.

३. शिवाय पंजाब व सिंथमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता सामाजिक अस्थिरतेला कारणीभूत ठरेल. म्हणूनच पाकिस्तानने जागतिक बँकेत दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे, पण भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतो.

४.पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने पंजाबमधून पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

काश्मीरचे नुकसान कधी भरून निघणार ?

काश्मीरची स्थिती अशी आहे की, स्वतःच्या पाण्यासाठी काश्मीर लढू शकत नाही. कारण खरा संघर्ष पाकिस्तानसोबत आहे. त्यामुळे काश्मीर न शेतासाठी पाणी थांबवू शकतो, ना अधिक जलविद्युत प्रकल्प उभारू शकतो. त्यामुळे दरवर्षी सुमारे ८००० कोटी रुपयांचे नुकसान जम्मू-काश्मीरला सहन करावे लागते.१९ सप्टेंबर १९६० रोजी झालेल्या या करारानंतर काश्मीरला त्या तीन पश्चिमी नद्यांवर धरणे बांधण्याची, किंवा सिंचनासाठी बरेज बांधण्याची परवानगी नाही. भारताने राबी, व्यास आणि सतलजचे पाणी स्वतःकडे ठेवले आहे, पण आज ते पंजाबआणि शेजारच्या राज्यांमधील वादाचे कागा बनले आहे.

म्हणूनच हा करारच काश्मीरच्या आर्थिक विकासाच्या आड येतो. यामुळे काश्मीर सरकारला स्वतःच्या नद्यांचे पाणी एकत्रित साठवण्याचा हक्क नाही. त्यामुळे काश्मीरचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला