शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:30 IST

बंगळुरु येथील एका व्यक्तीचा पहलगाम हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. विविध राज्यातील हे सर्व पर्यटक होते. दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन पर्यटकांवर गोळ्या चालवण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केले आणि महिला, मुलांना सोडून दिले. या हल्ल्यात कर्नाटकातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील रहिवासी मंजुनाथ राव आणि बंगळुरू येथील भरत भूषण अशी या मृतांची नावे आहेत.

भरत भूषण हे त्यांची पत्नी सुजाता आणि तीन वर्षांच्या मुलासोबत पहलगाममधील बेसरन परिसरात फिरायला गेला होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून भरत यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. त्यांची पत्नी आणि मुलगा कसेतरी बचावले. भरत भूषण आणि त्यांचे कुटुंब १८ एप्रिल रोजी एका टूर ऑपरेटरमार्फत काश्मीरला गेले होते. ते पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या ते डायग्नोस्टिक्स म्हणूने काम करत होते.

या घटनेनंतर भूषण यांच्या सासू विमला यांनी घटनेची माहिती दिली. "माझ्या मुलीने फोन करून आम्हाला याबाबत कळवले. ती एका आयटी कंपनीत काम करायची. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. तिने फोन केल्यावरच आम्हाला काय घडले ते कळालं. दहशतवाद्यांनी भरतला त्याचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले आणि ते तपासल्यानंतर त्याला मारण्यात आले. दहशतवाद्यांनी 'तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू? असे विचारले आणि मग मारले. माझ्या जावयाकडे बाळ होते. त्यांनी बाळाला खाली ठेवायला लावले आणि मग जावयावर गोळ्या झाडल्या," असे विमला यांनी सांगितले.

"दहशतवाद्यांनी भारतला जर तू मुस्लिम आहेस तर आम्ही तुला सोडून देऊ असे म्हटलं. पण भरतने आधीच सांगितले गेले होते की तो हिंदू आहे, त्यामुळे मी मुस्लीम आहे असं तो कसं म्हणू शकत होता. हिंदू असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी जावयाच्या डोक्यात गोळी झाडली. ते तीन मिनिटे त्याच्यावर गोळीबार करत राहिले. तो मरेपर्यंत ते थांबले नाहीत. ते नावावरून ओळखू शकत होते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही त्यांनी त्याला मारले," असेही विमला यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवमोग्गा येथील मंजुनाथ राव देखील त्यांच्या पत्नी आणि मुलासह पहलगाममध्ये गेले होते. ते रिअल इस्टेट व्यापारी होते. या हल्ल्यात त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBengaluruबेंगळूरTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर