शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:30 IST

बंगळुरु येथील एका व्यक्तीचा पहलगाम हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. विविध राज्यातील हे सर्व पर्यटक होते. दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन पर्यटकांवर गोळ्या चालवण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केले आणि महिला, मुलांना सोडून दिले. या हल्ल्यात कर्नाटकातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील रहिवासी मंजुनाथ राव आणि बंगळुरू येथील भरत भूषण अशी या मृतांची नावे आहेत.

भरत भूषण हे त्यांची पत्नी सुजाता आणि तीन वर्षांच्या मुलासोबत पहलगाममधील बेसरन परिसरात फिरायला गेला होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून भरत यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. त्यांची पत्नी आणि मुलगा कसेतरी बचावले. भरत भूषण आणि त्यांचे कुटुंब १८ एप्रिल रोजी एका टूर ऑपरेटरमार्फत काश्मीरला गेले होते. ते पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या ते डायग्नोस्टिक्स म्हणूने काम करत होते.

या घटनेनंतर भूषण यांच्या सासू विमला यांनी घटनेची माहिती दिली. "माझ्या मुलीने फोन करून आम्हाला याबाबत कळवले. ती एका आयटी कंपनीत काम करायची. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. तिने फोन केल्यावरच आम्हाला काय घडले ते कळालं. दहशतवाद्यांनी भरतला त्याचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले आणि ते तपासल्यानंतर त्याला मारण्यात आले. दहशतवाद्यांनी 'तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू? असे विचारले आणि मग मारले. माझ्या जावयाकडे बाळ होते. त्यांनी बाळाला खाली ठेवायला लावले आणि मग जावयावर गोळ्या झाडल्या," असे विमला यांनी सांगितले.

"दहशतवाद्यांनी भारतला जर तू मुस्लिम आहेस तर आम्ही तुला सोडून देऊ असे म्हटलं. पण भरतने आधीच सांगितले गेले होते की तो हिंदू आहे, त्यामुळे मी मुस्लीम आहे असं तो कसं म्हणू शकत होता. हिंदू असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी जावयाच्या डोक्यात गोळी झाडली. ते तीन मिनिटे त्याच्यावर गोळीबार करत राहिले. तो मरेपर्यंत ते थांबले नाहीत. ते नावावरून ओळखू शकत होते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही त्यांनी त्याला मारले," असेही विमला यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवमोग्गा येथील मंजुनाथ राव देखील त्यांच्या पत्नी आणि मुलासह पहलगाममध्ये गेले होते. ते रिअल इस्टेट व्यापारी होते. या हल्ल्यात त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBengaluruबेंगळूरTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर