शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:02 IST

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले हे ठिकाण आता ओसाड झाले आहे.

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड झाले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले जवळपास ५,००० घोडेवाले आणि सुमारे ६०० वाहनचालक आता उपजीविकेविना दिवस कंठत आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ख्याती असलेल्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या करण्यात आली. पर्यटन हंगाम एप्रिलपासून सुरू होऊन ऑक्टोबरपर्यंत चालतो. मात्र हा हल्ला झाल्यामुळे पर्यटक फिरकत नाहीत. 

‘पर्यटकांनी पहलगामला येणे थांबवू नये’

पोनीवाला असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वहीद वानी यांनी सांगितले की, ५ हजारांहून अधिक घोडेवाले कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत आहेत. पहलगामची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे अतिशय वाईट कृत्य आहे. मात्र पर्यटकांनी पहलगामला येणे थांबवू नये.

सीमाभागातील रहिवासी वावरतात भीतीच्या सावटाखाली

भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असल्यामुळे सध्या जम्मू-काश्मीर व अन्य सीमावर्ती भाग शांत आहे. मात्र सीमेपलीकडून होणारा गोळीबार, तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे तेथील लोक रोज मरणाशी दोन हात करतात. एका रहिवाशाने सांगितले की, जीव वाचविण्यासाठी ज्यात आश्रय घेतला जातो तो बंकर उडवून देण्याची ताकद तोफगोळ्यांमध्ये असते. त्यामुळेच या रहिवाशांना सतत भीतीच्या छायेत वावरावे लागते. 

वैष्णोदेवी यात्रेवर परिणाम

तणावाचा परिणाम माता वैष्णोदेवीच्या यात्रेवरही झाला आहे. ६ मे रोजी देशभरातून १२,९१७ भाविक कटऱ्यात दाखल झाले होते, तर ७ मे रोजी म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दिवशी ही संख्या १२,७६० होती. त्यानंतर भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली. ८ मे रोजी ८,६७०, ९ तारखेला ३,९६२, १० मे रोजी केवळ १,३५२, ११ तारखेला १,३०३, १२ मे रोजी १,६५८ व १३ मे रोजी २,८०८ भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. ७ दिवसांनंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन