शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:05 IST

२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम

नवी दिल्ली: अमेरिकेनं ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केलं, तशीच कारवाई करुन भारतानं हाफिज सईदचा खात्मा करावा, अशा चर्चा देशात अनेकदा होतात. आता या विषयावर देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाष्य केलं आहे. हाफिज सईदच्याविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात कधीच नव्हती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचा खात्मा करु शकतो. अमेरिकेनं लादेनविरोधात जशी कारवाई केली. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतामध्येही आहे, असं विधान काही तासांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं होतं. यानंतर चिदंबरम यांनी हाफिजबद्दल विधान केलं. चिदंबरम यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. 'मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईद कराचीतल्या सुरक्षितस्थळी होता. आता तर तो दिवसाढवळ्या अगदी मोकाट फिरतो. अमेरिकेनं अबोटाबादमध्ये घुसून ओसामाला कंठस्नान घातलं होतं. मात्र आपल्याकडे तशी क्षमता नाही,' असं चिदंबरम म्हणाले. 'आपल्याकडे तेव्हादेखील (२००८ मध्ये) तशी क्षमता नव्हती आणि आपल्याकडे आज तशी क्षमता असेल, तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेल. आम्ही अमेरिकेसारखी कारवाई करायचा प्रयत्न केला असता, तर आम्हाला अपयश आलं असतं आणि त्याचा मोठा फटका बसला असता,' असं चिदंबरम यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही त्यानंतर कूटनिटीचा वापर करुन पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला. २६/११ सारखा दुसरा हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश आम्ही कूटनितीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिला होता,' असं चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानBJPभाजपाcongressकाँग्रेस