शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:05 IST

२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम

नवी दिल्ली: अमेरिकेनं ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केलं, तशीच कारवाई करुन भारतानं हाफिज सईदचा खात्मा करावा, अशा चर्चा देशात अनेकदा होतात. आता या विषयावर देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाष्य केलं आहे. हाफिज सईदच्याविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात कधीच नव्हती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचा खात्मा करु शकतो. अमेरिकेनं लादेनविरोधात जशी कारवाई केली. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतामध्येही आहे, असं विधान काही तासांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं होतं. यानंतर चिदंबरम यांनी हाफिजबद्दल विधान केलं. चिदंबरम यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. 'मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईद कराचीतल्या सुरक्षितस्थळी होता. आता तर तो दिवसाढवळ्या अगदी मोकाट फिरतो. अमेरिकेनं अबोटाबादमध्ये घुसून ओसामाला कंठस्नान घातलं होतं. मात्र आपल्याकडे तशी क्षमता नाही,' असं चिदंबरम म्हणाले. 'आपल्याकडे तेव्हादेखील (२००८ मध्ये) तशी क्षमता नव्हती आणि आपल्याकडे आज तशी क्षमता असेल, तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेल. आम्ही अमेरिकेसारखी कारवाई करायचा प्रयत्न केला असता, तर आम्हाला अपयश आलं असतं आणि त्याचा मोठा फटका बसला असता,' असं चिदंबरम यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही त्यानंतर कूटनिटीचा वापर करुन पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला. २६/११ सारखा दुसरा हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश आम्ही कूटनितीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिला होता,' असं चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानBJPभाजपाcongressकाँग्रेस