शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:07 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत भाजपाकडून ना कुणी माफी मागितली ना कुणी राजीनामा दिला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये प्रसाराचासाठी आलेल्या पी. चिदंबरम यांनी गुजरात सरकार दिल्लीहून चालवलं जात असल्याचा आरोप केला. 

गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. मोरबीत ब्रिटीश कालीन केबल पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. एका खासगी कंपनीकडून या पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं गेलं होतं आणि चारच दिवसांनी ही दुर्घटना घडली होती. 

"मोरबी दुर्घटनेबाबत जितकं मला माहित आहे त्यानुसार आतापर्यंत या घटनेसाठी सरकारकडून ना कुणी माफी मागितली आणि ना कुणी राजीनामा दिला आहे. हिच घटना जर परदेशात घडली असती तर तातडीनं राजीनामे घेण्यात आले असते. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू असं भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेसाठी जनतेला उत्तर देणं त्यांना महत्वाचं वाटत नाही. गुजरातचं सरकार मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीतून चालवलं जात आहे", असं पी. चिदंबरम म्हणाले. 

काँग्रेसला संधी देण्याचं केलं आवाहन"ज्या राज्यांमध्ये लोक सरकारला पराभूत करतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते वाटते. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की हे सरकार बदला आणि काँग्रेसला संधी द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नोकर असल्याचसारख्या वागत आहेत. या संस्थांनी अटक केलेल्यांपैकी ९५ टक्के विरोधी पक्षांचे राजकारणी आहेत", असंही पी. चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलcongressकाँग्रेस