शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:47 IST

तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने टीडीपी, डीजेएस आणि सीपीआयसोबत आघाडी केली असली, तरी टीआरएसला ७४ जागांवर विजय मिळेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने केलेल्या विकासामुळेच त्यांना पुन्हा सत्तेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन ओवेसी प्रत्येक सभेत करत आहेत.राज्यात मुख्य लढत काँग्रेस आघाडी व टीआरएस अशीच होईल. तरीही यात सरकार स्थापन करताना एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हैदराबादमध्ये मोठी ताकद असलेल्या एमआयएमने गेल्यावेळी ७ जागांवर विजय मिळवला होता. ज्या मतदारसंघांत आमचे उमेदवार रिंगणात आहेत. तिथे आम्ही प्रचार करीतच आहोत. मात्र, ज्या भागात आमचे उमेदवार नाहीत. तिथे काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या विरोधात टीआरएसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असे ओवेसी सांगत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस आणि टीडीपीने विषमतेचे राजकारण केले असून, विकासाच्या नावावर जनतेला केवळ भुलथापा दिल्या आहेत. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या तुलनेत केसीआर यांनी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या असून, त्यामुळे मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे, असे ओवेसी यांनी बोलून दाखवले.आम्ही नेहमी विकासाच्या बाजूचे राजकारण केले आहे. तहीही काँग्रेस नेहमीच आम्हाला आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आली आहे. त्यांचा विरोध केला की, आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला १९९८ तो २०१२ पर्यंत काँग्रेसची एफ टीम, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता आम्हाला बी टीम म्हटले जात आहे. आम्ही केलेल्या विकासामुळेच त्यांना आमची दखल घ्यावी लागत आहे, हाच त्याचा अर्थ आहे. येत्या २-३ वर्षांत आम्हीच ए टीम असू, असा दावा ओवेसी यांनी केला.ठग्ज आॅफ तेलंगणाकेसीआर यांनी स्वत:च्या कुटुंबाचाच फायदा केला असून, सत्ता घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेचा विकास न करता केवळ ठकविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच केसीआर यांनी स्वत:चा मुलगा, मुलगी, पुतण्या, आणि भाचा यांना सत्तेत वाटा देऊन जनतेला ठकविले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील फसविले आहे, असा आरोप काँग्रेस आघाडी आणि भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, त्याबाबत येथील मतदार उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आमचे म्हणणे काय आहे, ते निवडणूक निकालांतूनच कळेल, असे ते सांगतात.>टीआरएसला ७४ जागा मिळतीलमी काही भविष्यवेत्ता नाही किंवा माझा त्यावर विश्वास नाही. मात्र, जे वातावरण सध्या सर्वत्र दिसत आहे, त्यावरून टीआरएसला ७४ जागा मिळतील, असे ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही ज्या ८ जागा लढवत आहोत, तिथे आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी