शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:47 IST

तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने टीडीपी, डीजेएस आणि सीपीआयसोबत आघाडी केली असली, तरी टीआरएसला ७४ जागांवर विजय मिळेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने केलेल्या विकासामुळेच त्यांना पुन्हा सत्तेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन ओवेसी प्रत्येक सभेत करत आहेत.राज्यात मुख्य लढत काँग्रेस आघाडी व टीआरएस अशीच होईल. तरीही यात सरकार स्थापन करताना एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हैदराबादमध्ये मोठी ताकद असलेल्या एमआयएमने गेल्यावेळी ७ जागांवर विजय मिळवला होता. ज्या मतदारसंघांत आमचे उमेदवार रिंगणात आहेत. तिथे आम्ही प्रचार करीतच आहोत. मात्र, ज्या भागात आमचे उमेदवार नाहीत. तिथे काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या विरोधात टीआरएसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असे ओवेसी सांगत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस आणि टीडीपीने विषमतेचे राजकारण केले असून, विकासाच्या नावावर जनतेला केवळ भुलथापा दिल्या आहेत. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या तुलनेत केसीआर यांनी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या असून, त्यामुळे मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे, असे ओवेसी यांनी बोलून दाखवले.आम्ही नेहमी विकासाच्या बाजूचे राजकारण केले आहे. तहीही काँग्रेस नेहमीच आम्हाला आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आली आहे. त्यांचा विरोध केला की, आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला १९९८ तो २०१२ पर्यंत काँग्रेसची एफ टीम, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता आम्हाला बी टीम म्हटले जात आहे. आम्ही केलेल्या विकासामुळेच त्यांना आमची दखल घ्यावी लागत आहे, हाच त्याचा अर्थ आहे. येत्या २-३ वर्षांत आम्हीच ए टीम असू, असा दावा ओवेसी यांनी केला.ठग्ज आॅफ तेलंगणाकेसीआर यांनी स्वत:च्या कुटुंबाचाच फायदा केला असून, सत्ता घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेचा विकास न करता केवळ ठकविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच केसीआर यांनी स्वत:चा मुलगा, मुलगी, पुतण्या, आणि भाचा यांना सत्तेत वाटा देऊन जनतेला ठकविले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील फसविले आहे, असा आरोप काँग्रेस आघाडी आणि भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, त्याबाबत येथील मतदार उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आमचे म्हणणे काय आहे, ते निवडणूक निकालांतूनच कळेल, असे ते सांगतात.>टीआरएसला ७४ जागा मिळतीलमी काही भविष्यवेत्ता नाही किंवा माझा त्यावर विश्वास नाही. मात्र, जे वातावरण सध्या सर्वत्र दिसत आहे, त्यावरून टीआरएसला ७४ जागा मिळतील, असे ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही ज्या ८ जागा लढवत आहोत, तिथे आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी