शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:04 IST

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.

हैदराबादमधील एक नेता म्हणाला होता की १५ मिनिटांसाठी पोसील हटवा, मग समजेल. जर आपण गांभीर्याने विचार केला तर तो नेता, जे म्हणाला, ते काही अंशी बरोबरच म्हणाला. जर असे झाले तर जवळजवळ अर्धे हिंदू एकाच झटक्यात नष्ट होतील. तसे पाहिले, तर आपल्याकडे आहे काय? ना आपण आपली  आपण वंश वृद्धी करत आहोत, ना शस्त्रे संचय," असे कुडाचे आमदार राजा भैया यांनी म्हटले आहे. ते महाकुंभमेळ्यात बोलत होते. 

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.

राजा भैया पुढे म्हणाले, "शास्त्रे संरक्षण देऊ शकत नाहीत हे खरे आहे. संस्कृतींचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे आवश्यक आहेत. तक्षशिला नष्ट झाली नसती. एका दरोडेखोराने नालंदाला आग लावली. तेथे काही महिने पुस्तके जळत राहिली. जेव्हा जेव्हा देवाने अवतार घेत, तेव्हा तेव्हा त्यांनी शस्त्र धारण केले. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हा त्यांनी सर्व काही सोडले, पण शस्त्रे सोबत घेतली. जेव्हा आपण मातेची पूजा करतो तेव्हा ती देखील शस्त्रधारी असते. हनुमानजींच्या हातून कधी गदा सुटली नाही आणि शिवशंकरांच्या हाती नेहमीच त्रिशूल असतो. धर्मग्रंथ आपल्याला कधी काय वापरायचे हे सांगतात, पण ते शस्त्रास्त्रे सोडायला सांगत नाहीत. पण हिंदू काय करत आहेत हा विचार करण्यासारखा विषय आहे. ते त्यांचा वंश ही वाढवत नाहीत आणि त्यांच्याकडे शस्त्रेही नाहीत.

ते पुढे म्हणाले, "मूर्ती विसर्जनादरम्यानही हल्ले होतात, हे आपण बघतो. आपण कुणालाही काही केले नाही. जर कोणी भारतात आश्रय मागितला तर त्याला तो मिळाला. आमची अट अशी नव्हती की तुम्ही तुमचा धर्म बदलला तरच हे होईल. मुस्लिम, ज्यू आणि तिबेटीय, या सर्वांना भारताने आश्र दिला. यावर कोणत्याही भारतीयाचा आक्षेप नव्हता. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही म्हणता की, जो माझा देव आहे, त्यालाच मानावे लागेल. जर तुम्ही हे केले नाही, तर तुम्हाला मारले जाईल, दहशतवादी हल्ले होतील. असे हल्ले काशी, प्रयाग, अक्षरधामवर असोत अथवा भारताच्या संसदेवर अशोत." पुढे जनसत्ता दलाचे नेते म्हणाले, "धर्माच्या नावाखाली हिंदूंसोबत जेवढी लूटमार झाली, जेवढे बलात्कार आणि हत्या झाल्या, तेवढे इतर कुणासोबतही झाले नाही. यावर सर्वजण सहमत असतील. आम्ही शस्त्रे सोडली आणि कुटनितीच्या नावाखाली जाती-जातींमध्ये विभागले गेले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, भारतातील अनेक लोकांनी त्यांचे साम्राज्य रक्षण करण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी लढा दिला, पण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्यता आहे. तसेच शस्त्र बाळगणे आवश्यक आहे आणि जर आज देश सुरक्षित असेल तर तो सैन्यामुळेच आहे. आपण एक प्राचीन देश आहोत आणि आपण खूप ज्ञानी आहोत म्हणून नाही. आज जर इस्रायल टिकून आहे तर तो केवळ त्याच्या सशस्त्र बळामुळेच आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाHinduहिंदूHinduismहिंदुइझम