शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:04 IST

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.

हैदराबादमधील एक नेता म्हणाला होता की १५ मिनिटांसाठी पोसील हटवा, मग समजेल. जर आपण गांभीर्याने विचार केला तर तो नेता, जे म्हणाला, ते काही अंशी बरोबरच म्हणाला. जर असे झाले तर जवळजवळ अर्धे हिंदू एकाच झटक्यात नष्ट होतील. तसे पाहिले, तर आपल्याकडे आहे काय? ना आपण आपली  आपण वंश वृद्धी करत आहोत, ना शस्त्रे संचय," असे कुडाचे आमदार राजा भैया यांनी म्हटले आहे. ते महाकुंभमेळ्यात बोलत होते. 

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.

राजा भैया पुढे म्हणाले, "शास्त्रे संरक्षण देऊ शकत नाहीत हे खरे आहे. संस्कृतींचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे आवश्यक आहेत. तक्षशिला नष्ट झाली नसती. एका दरोडेखोराने नालंदाला आग लावली. तेथे काही महिने पुस्तके जळत राहिली. जेव्हा जेव्हा देवाने अवतार घेत, तेव्हा तेव्हा त्यांनी शस्त्र धारण केले. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हा त्यांनी सर्व काही सोडले, पण शस्त्रे सोबत घेतली. जेव्हा आपण मातेची पूजा करतो तेव्हा ती देखील शस्त्रधारी असते. हनुमानजींच्या हातून कधी गदा सुटली नाही आणि शिवशंकरांच्या हाती नेहमीच त्रिशूल असतो. धर्मग्रंथ आपल्याला कधी काय वापरायचे हे सांगतात, पण ते शस्त्रास्त्रे सोडायला सांगत नाहीत. पण हिंदू काय करत आहेत हा विचार करण्यासारखा विषय आहे. ते त्यांचा वंश ही वाढवत नाहीत आणि त्यांच्याकडे शस्त्रेही नाहीत.

ते पुढे म्हणाले, "मूर्ती विसर्जनादरम्यानही हल्ले होतात, हे आपण बघतो. आपण कुणालाही काही केले नाही. जर कोणी भारतात आश्रय मागितला तर त्याला तो मिळाला. आमची अट अशी नव्हती की तुम्ही तुमचा धर्म बदलला तरच हे होईल. मुस्लिम, ज्यू आणि तिबेटीय, या सर्वांना भारताने आश्र दिला. यावर कोणत्याही भारतीयाचा आक्षेप नव्हता. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही म्हणता की, जो माझा देव आहे, त्यालाच मानावे लागेल. जर तुम्ही हे केले नाही, तर तुम्हाला मारले जाईल, दहशतवादी हल्ले होतील. असे हल्ले काशी, प्रयाग, अक्षरधामवर असोत अथवा भारताच्या संसदेवर अशोत." पुढे जनसत्ता दलाचे नेते म्हणाले, "धर्माच्या नावाखाली हिंदूंसोबत जेवढी लूटमार झाली, जेवढे बलात्कार आणि हत्या झाल्या, तेवढे इतर कुणासोबतही झाले नाही. यावर सर्वजण सहमत असतील. आम्ही शस्त्रे सोडली आणि कुटनितीच्या नावाखाली जाती-जातींमध्ये विभागले गेले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, भारतातील अनेक लोकांनी त्यांचे साम्राज्य रक्षण करण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी लढा दिला, पण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्यता आहे. तसेच शस्त्र बाळगणे आवश्यक आहे आणि जर आज देश सुरक्षित असेल तर तो सैन्यामुळेच आहे. आपण एक प्राचीन देश आहोत आणि आपण खूप ज्ञानी आहोत म्हणून नाही. आज जर इस्रायल टिकून आहे तर तो केवळ त्याच्या सशस्त्र बळामुळेच आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाHinduहिंदूHinduismहिंदुइझम