शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कॅनडा की अमेरिका? सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कोणत्या देशात शिकत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 21:07 IST

१३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले.

नवी दिल्ली : परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. १३ लाखांहून अधिक भारतीयविद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवासी विद्यार्थ्यांची आकडेवारी सरकार ठेवते का, असा प्रश्न कीर्तीवर्धन सिंह यांना विचारण्यात आला होता. यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, रशिया, इस्रायल आणि युक्रेनसह १०८ देशांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे सविस्तर माहिती दिली.

दिलेल्या माहितीनुसार, सध्या १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३ मध्ये हा आकडा १३, १८, ९५५ होता, तर २०२२ मध्ये हा आकडा ९,०७,४०४  होता. कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, चालू वर्षात १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थ्यांपैकी कॅनडात ४,२७,०००, अमेरिकेत ३,३७,६३०, चीनमध्ये ८५८०,  ग्रीसमध्ये ८ ,  इस्रायलमध्ये ९००, पाकिस्तानात १४ आणि युक्रेनमध्ये २५१० विद्यार्थी   शिकत आहेत. 

दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, भारत सरकार व्हिसा फ्री एंट्री ट्रॅव्हल, व्हिसा ऑन अरायव्हल यासारख्या सुविधा देऊ शकतील अशा देशांची संख्या वाढवण्यासाठी भारतीयांना जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचबरोबर, परदेशात भारतीय मिशन/पोस्ट नियमितपणे परदेशात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात आणि त्यांना त्यांच्याकडे किंवा ग्लोबल रिश्ता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे कीर्तीवर्धन सिंह म्हणाले.

भारतीय मिशन/पोस्टद्वारे प्रथमच परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केले जाते. त्यांच्याकडून यजमान देशांमधील सुरक्षा समस्यांबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना भारतीय मिशन/पोस्टमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि नियमितपणे कनेक्ट राहण्यासाठी सल्ला दिला जातो. तसेच, भारतीय मिशन्स/पोस्ट्स वरील पद्धतीचा वापर स्वैच्छिक नोंदणीद्वारे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी करतात, अशी माहिती सुद्धा कीर्ती वर्धन सिंग यांनी दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीIndiaभारतEducationशिक्षण