शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कॅनडा की अमेरिका? सर्वाधिक भारतीय विद्यार्थी कोणत्या देशात शिकत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 21:07 IST

१३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले.

नवी दिल्ली : परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. १३ लाखांहून अधिक भारतीयविद्यार्थी सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, असे सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवासी विद्यार्थ्यांची आकडेवारी सरकार ठेवते का, असा प्रश्न कीर्तीवर्धन सिंह यांना विचारण्यात आला होता. यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, रशिया, इस्रायल आणि युक्रेनसह १०८ देशांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे सविस्तर माहिती दिली.

दिलेल्या माहितीनुसार, सध्या १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३ मध्ये हा आकडा १३, १८, ९५५ होता, तर २०२२ मध्ये हा आकडा ९,०७,४०४  होता. कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, चालू वर्षात १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थ्यांपैकी कॅनडात ४,२७,०००, अमेरिकेत ३,३७,६३०, चीनमध्ये ८५८०,  ग्रीसमध्ये ८ ,  इस्रायलमध्ये ९००, पाकिस्तानात १४ आणि युक्रेनमध्ये २५१० विद्यार्थी   शिकत आहेत. 

दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, भारत सरकार व्हिसा फ्री एंट्री ट्रॅव्हल, व्हिसा ऑन अरायव्हल यासारख्या सुविधा देऊ शकतील अशा देशांची संख्या वाढवण्यासाठी भारतीयांना जगभरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचबरोबर, परदेशात भारतीय मिशन/पोस्ट नियमितपणे परदेशात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात आणि त्यांना त्यांच्याकडे किंवा ग्लोबल रिश्ता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे कीर्तीवर्धन सिंह म्हणाले.

भारतीय मिशन/पोस्टद्वारे प्रथमच परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित केले जाते. त्यांच्याकडून यजमान देशांमधील सुरक्षा समस्यांबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना भारतीय मिशन/पोस्टमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि नियमितपणे कनेक्ट राहण्यासाठी सल्ला दिला जातो. तसेच, भारतीय मिशन्स/पोस्ट्स वरील पद्धतीचा वापर स्वैच्छिक नोंदणीद्वारे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी करतात, अशी माहिती सुद्धा कीर्ती वर्धन सिंग यांनी दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीIndiaभारतEducationशिक्षण