शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

लोकांच्या भावना दडपल्यास उद्रेक होईल - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 07:28 IST

पुणे पोलिसांना फटकारले : विरोधी मत मांडू देणे आवश्यक तसेच कोरेगांव-भीमा प्रकरणी पकडलेल्या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली/पुणे : लोकशाहीमध्ये वेगळे वा विरोधी मत मांडू देणे आवश्यकच असते. त्यामुळे लोकांच्या मनातील भावनांना वाचा मिळते. ते दडपण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेकच होऊ शकतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले. पाचही माओवादी समर्थकांना केवळ नजरकैदेत ठेवण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिला. त्यापैकी तिघे अटकेत असून, दोघे नजरकैदेतच आहेत. न्यायालयाचा हा आदेश म्हणजे पुणे पोलिसांना जणू तंबी असल्याचेच मानले जाते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अटक झालेल्या तिघांची सुटका करण्याचे आदेश पुणे न्यायालयानेही दिले. त्यांना आज विश्रामगृहात ठेवण्यात येणार असून, गुरुवारी त्यांना घरी पाठविले जाईल. मात्र तिथे ते ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत असतील. त्यांच्या अटकेच्या विरोधातील याचिकेची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी छापे घालून पाच माओवादीसमर्थर्काना अटक केली होती. त्यापैकी गौतम नवलखा यांना दिल्लीबाहेर नेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने ते घरीच नजरकैदेत होते, तर श्रीमती सुधा भारद्वाज यांनाही नजरकैदेतच ठेवले होते. भीमा कोरेगांव हिंसक दंगलीप्रकरणी डाव्या विचारांच्या या पाच जणांना झालेली अटक व महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, दिल्ली व झारखंडात झालेली छापेमारी याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या अटकेची दखल घेत, राज्य सरकारला जाब विचारला. अटकेविरोधात स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.हाती ठोस पुरावेगृह मंत्रालयाच्या सूत्रांनी असा दावा केला की महाराष्ट्र पोलिसांकडे पाचही आरोपींविरूध्द पुरेसे पुरावे आहेत. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हाती सबळ पुरावे आल्यानंतरच डाव्या विचारकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार