शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लोकांच्या भावना दडपल्यास उद्रेक होईल - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 07:28 IST

पुणे पोलिसांना फटकारले : विरोधी मत मांडू देणे आवश्यक तसेच कोरेगांव-भीमा प्रकरणी पकडलेल्या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली/पुणे : लोकशाहीमध्ये वेगळे वा विरोधी मत मांडू देणे आवश्यकच असते. त्यामुळे लोकांच्या मनातील भावनांना वाचा मिळते. ते दडपण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेकच होऊ शकतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले. पाचही माओवादी समर्थकांना केवळ नजरकैदेत ठेवण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिला. त्यापैकी तिघे अटकेत असून, दोघे नजरकैदेतच आहेत. न्यायालयाचा हा आदेश म्हणजे पुणे पोलिसांना जणू तंबी असल्याचेच मानले जाते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अटक झालेल्या तिघांची सुटका करण्याचे आदेश पुणे न्यायालयानेही दिले. त्यांना आज विश्रामगृहात ठेवण्यात येणार असून, गुरुवारी त्यांना घरी पाठविले जाईल. मात्र तिथे ते ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत असतील. त्यांच्या अटकेच्या विरोधातील याचिकेची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी छापे घालून पाच माओवादीसमर्थर्काना अटक केली होती. त्यापैकी गौतम नवलखा यांना दिल्लीबाहेर नेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने ते घरीच नजरकैदेत होते, तर श्रीमती सुधा भारद्वाज यांनाही नजरकैदेतच ठेवले होते. भीमा कोरेगांव हिंसक दंगलीप्रकरणी डाव्या विचारांच्या या पाच जणांना झालेली अटक व महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, दिल्ली व झारखंडात झालेली छापेमारी याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या अटकेची दखल घेत, राज्य सरकारला जाब विचारला. अटकेविरोधात स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.हाती ठोस पुरावेगृह मंत्रालयाच्या सूत्रांनी असा दावा केला की महाराष्ट्र पोलिसांकडे पाचही आरोपींविरूध्द पुरेसे पुरावे आहेत. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हाती सबळ पुरावे आल्यानंतरच डाव्या विचारकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार