शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

इतर आरोपीही लक्ष्य?

By admin | Updated: March 8, 2015 01:32 IST

दिमापूर येथील भीषण घटनेनंतर नागालँडमधील स्थिती तणावपूर्ण असून, बलात्काराचे इतर आरोपी जनतेच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोहिमा : बलात्काराच्या आरोपीला जमावाने कारागृहातून बाहेर खेचून आणून ठेचून मारल्याच्या दिमापूर येथील भीषण घटनेनंतर नागालँडमधील स्थिती तणावपूर्ण असून, बलात्काराचे इतर आरोपी जनतेच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या घटनेचे खापर केंद्रीय सुरक्षा दलांवर फोडले आहे, तर नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.आरोपीला जमावाने ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राला आपला अहवाल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात इतरही अनेक तुरुंगांच्या ठिकाणी अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. राज्यातील स्थिती तणावपूर्ण असली तरी राज्य सरकारच्या अहवालाने केंद्राची चिंता वाढवली आहे. दरम्यान, आरोपीला ठार करण्याच्या घटनेचे खापर केंद्रीय दलांवर फोडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई गुवाहाटी येथे म्हणाले की, कारागृहाला केंद्रीय दलांची सुरक्षा होती. ती कुचकामी ठरल्यामुळेच हा प्रकार घडला. प्रत्येक कैद्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे.गोगोई यांनी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या राज्यातील आसामी लोकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे. जमावाने ज्या आरोपीला ठार केले तो सईद फरीद खान आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर येथील रहिवासी होता. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनीही कायदा-सुव्यवस्था राखली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील दोषीवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)च्नागालँडचे व्यावसायिक केंद्र असलेल्या दिमापूर येथे मागील दोन दिवसांत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक अकितो सेमा यांनी सांगितले की, या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आयआरबीच्या ११ कंपन्या आणि सीआरपीएफच्या ३ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ५ मार्च रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. च्रस्त्यावर नंबर प्लेट नसलेल्या अनेक गाड्या पडलेल्या दिसत आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. या घटनेचे व्हिडिओ क्लिपिंग हाती लागले आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करणे फारसे अवघड नाही. शहरातील स्थिती सुधारेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील. आम्ही आता कसलीही स्थिती हाताळण्यास सज्ज आहोत, असे सेमा यांनी सांगितले.