शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 06:50 IST

दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार; इंटरनेट बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली’ मोर्चा राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ३०,००० हून अधिक अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिस दल जय्यत तयारी करत आहे.

शेकडो शेतकऱ्यांना दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबालाजवळ हरयाणाला लागून असलेल्या राज्याच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, आंदोलक पुढे आल्यास त्यांना दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी आधीच मोठ्या प्रमाणात अश्रूधुराच्या नळकांड्यांचा साठा केला आहे आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे असलेल्या बीएसएफच्या टीयर स्मोक युनिटकडून (टीएसयू) आणखी ३०,००० नळकांड्या मागवल्या आहेत. त्या ग्वाल्हेरहून दिल्लीत आणल्या जात आहेत. दरम्यान, पंजाब, हरयाणामध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

पोलिस सतर्कnआंदोलन सुरूच राहिल्याने दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी दंगलविरोधी पथक, सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. nहरयाणासह टिकरी आणि सिंघू या दोन सीमा बंद असताना, उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

नळकांड्यांची एक्स्पायरी तीन वर्षेप्रत्येक अश्रूधुराचे नळकांडे जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वापरता येते, त्यानंतर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो, परंतु ते सैन्याच्या सरावासाठी सात वर्षांपर्यंत वापरले जातात. एक्स्पायरी झालेल्या अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर आंदोलनात करण्यात आल्याचे समोर आले आहे.

‘आमच्या शेतकऱ्यांना सोडा’नवी दिल्लीकडे कूच करताना भोपाळमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या कर्नाटकातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात यावी, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना केली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीPoliceपोलिस