शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

CAA-NRCच्या विरोधात विरोधकांनी प्रदर्शन करू नये, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 17:01 IST

काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. 

ठळक मुद्देआता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'नेत्यांचा अभिमान आणि महत्वाकांक्षा संपवणं ही काळाची मागणी आहे, असं राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले. काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. 

कोलकाताः दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं खराब कामगिरीचं प्रदर्शन केल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 'नेत्यांचा अभिमान आणि महत्वाकांक्षा संपवणं ही काळाची मागणी आहे, असं राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम म्हणाले. काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच त्यांच्या वाटेत काटे न पेरता त्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे. विरोधी पक्षांनी CAA-NRCच्या विरोधात प्रदर्शन करण्यापासून दोन हात लांबच राहिलं पाहिजे. जनतेच्या आंदोलनांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नये. कोणाच्या एकाच्या हातात जादू नाही, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. एकत्रित कार्य, सामूहिक शिस्त आणि प्रत्येक व्यक्तीनं अहंकार बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचं हे आव्हान असेल. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या भविष्याबद्दल जयराम रमेश यांना विचारलं असता ते म्हणाले, आपल्या सर्वांची स्वतःची अशी एक महत्त्वाकांक्षा असते, परंतु पक्षाला पुन्हा उभे करणं आवश्यक आहे. तसेच सत्तेवर परत येणंसुद्धा गरजेचं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा एकही जागा न आणल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आणि नेते एकमेकांवर आरोप करू लागले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करावे, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसमधील दिग्गजांना दिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यांतही सत्ता गमावली. तथापि आम्ही परत काही ठिकाणी सत्तेवर आलो. आपल्याकडे अजून जाण्यासाठी खूप पल्ला बाकी आहे. अर्थात बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसतोय,  पण बोगदा खूप लांब आहे. तो प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला अजून खूप पुढे जावं लागणार आहे. आपले पुस्तक 'अ चेकर्ड ब्रिलियन्स: द मॅनी लिव्ह्स ऑफ व्ही.के. कृष्णा मेनन' या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या बोलण्याविषयी फार सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण भाजपा नेहमीच ध्रुवीकरण करण्याचं आणि जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करते."सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर)च्या विरोधात होत असलेल्या वारंवार निदर्शनांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, या विषयाचे राजकारण केले जाऊ नये. या जनआंदोलनांपासून आपण आपले अंतर राखून ठेवले पाहिजे. आपण त्यांचे राजकारण करण्याचा किंवा त्यांचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू नये. काही गोष्टी राजकीय पक्ष करू शकत नाहीत. ते जनआंदोलनाच्या माध्यमातूनच सुटत असतात

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसीcongressकाँग्रेस