शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विरोधकांनो देशाला वाचवण्यासाठी एक व्हा; तेलुगू देसमने NDA सोडल्यानंतर ममता बॅनर्जींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:57 IST

देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली: वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव आणि शुक्रवारी तेलुगू देसमने पक्षाने तडकाफडकी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींनी कमालीचा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एक आवाहन केले आहे. मी तेलुगू देसमच्या रालोआतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे स्वागत करते. देशाला संकटातून वाचवण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्षांनी अत्याचार, आर्थिक संकट, राजकीय अस्थिरतेच्याविरोधात एकत्र यावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. 

वायएसआर काँग्रेसकडून शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानेही आज सकाळी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले होते. परंतु, काही वेळापूर्वीच शिवसेनेतील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबद्दलची माहिती दिली. तेलुगू देसमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, आम्ही मतदानाच्यावेळी तटस्थ राहू, असे या नेत्यांनी सांगितले. टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी तेलुगू देसमने केली असून, ती मान्य होत नसल्याने गेल्याच आठवड्यात तेलुगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी तेलुगू देसमने एनडीएतच राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र तरीही मागणी मान्य होत नसल्याने नायडू हे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabhaलोकसभाNo Confidence motionअविश्वास ठराव