शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:40 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. संसद अधिवेशनाआधी केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले, ज्या लोकांची नजर मे २०१९ वर आहे त्यांनी वाद-विवाद घालावा; परंतु संसद सभागृहात संवाद करावा.भाजपाच्या सूत्रांनुसार संसद सत्राच्या पहिल्या दिवशीच संवादाचा उल्लेख करून २०१९ च्या तयारीचे संकेत मोदी यांनी दिले आहेत. याचा अर्थ असा की, मोदी या निकालांना भाजपासाठी अंतिम मानत नाहीत. या निकालांनी मोदी यांची जादू संपली, असे जे कोणी समजत असतील ते चूक आहेत. याचे कारण असे की, छत्तीसगड वगळता राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला ज्या जोरदार यशाची आशा होती ती धुळीस मिळाली. ही परिस्थिती मोदी यांच्या सभा आणि जनसंपर्क सभांमुळे निर्माण झाली. मोदी जेथे गेले तेथे मतांमध्ये ४-५ टक्के वाढ झाली. परिणामी, भाजपा पुन्हा स्पर्धेत आला आहे.लोकांचा राग हा राज्याच्या नेतृत्वावर आहे. मोदी यांच्यावरील विश्वास कायम आहे. यामुळेच राजस्थानात काँग्रेसला आधी १५० जागा मिळतील असे दावे होते. तेथे मोदी यांच्या दौऱ्यांमुळे कसाबसा तो विजयाजवळ गेला. मध्यप्रदेशातही हीच स्थिती होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका विरोधकांना २०१४ प्रमाणे कठीण जाणार असल्याचे भाजपातील सुत्रांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदcongressकाँग्रेस