शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

विरोधक दिल्लीत एकत्र, राज्यांत मात्र मार्ग वेगवेगळा; राहुल गांधींच्या मुद्द्यावरून स्थानिक व्हाेटबॅंक गमाविण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 08:57 IST

प्रमुख प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत काँग्रेससाेबत आघाडी करण्याची शक्यता सध्यातरी अंधुकच दिसत आहे.

- सुनील चावकेनवी दिल्ली : ईडी, सीबीआय, ईव्हीएम तसेच राहुल गांधींसह विरोधी पक्षनेत्यांविरुद्धच्या खटल्यांसारख्या निवडक मुद्द्यांवरून मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्ष दिल्लीत काँग्रेससोबत आक्रमक झाले आहेत; पण आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरुद्ध राहुल गांधी मैदानात कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रमुख प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत काँग्रेससाेबत आघाडी करण्याची शक्यता सध्यातरी अंधुकच दिसत आहे.

खासदारकी रद्द झाली तरी आपण मोदी सरकारविरुद्ध लढतच राहू, या राहुल गांधींच्या विधानामुळे सपा, तृणमूल, वायएसआर काँग्रेस, बीजेडी, आरजेडी, जेडीयू, आप, जनता दल सेक्युलर, तेलंगण राष्ट्रसमिती, केरळमधील माकप-भाकप आणि एयूडीएफसारखे पक्ष काँग्रेसपासून दूर राहण्याची चिन्हे  आहेत. 

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरुद्ध राहुल गांधींचा मान्य नसलेला चेहरा आणि राज्यांमध्ये काँग्रेस मतांचे न होणारे हस्तांतरण यामुळे काँग्रेसशी समझोता करण्याची या पक्षांची तयारी नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक नाहीत. अमेठी मतदारसंघात तसेच वेळ आली तर रायबरेलीमध्येही समाजवादी पक्षाने आपले उमेदवार उतरवण्याची तयारी चालवली आहे. 

रिक्त झालेल्या वायनाडमध्ये पाेटनिवडणुकीत डावी आघाडी आपला उमेदवार उतरवेल. काँग्रेस आणि ममता बनर्जींच्या तृणमूलमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे तेथे आघाडीची शक्यता धुसर आहे. बिहारमध्ये काँग्रेससाठी जागा सोडणे जोखमीचे ठरेल, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसशी युती केल्यास व्होटबँक गमावून बसावी लागेल, असे आम आदमी पार्टीच्या नेत्यांना वाटते. 

 प्रादेशिक पक्षांची मन:स्थिती वेगळी 

राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात दिल्लीत एकजूट झाले असले तरी हे प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्रसमिती आणि जद सेक्युलरचा काँग्रेसऐवजी ममता बनर्जींसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा कल आहे. त्या दृष्टीने त्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. या पक्षांचे वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये लोकसभेच्या २२५ हून अधिक जागा आहेत. तिथे अस्तित्व नगण्य असले तरी काँग्रेसने निवडणूक लढल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस