शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

माझ्याविषयीच्या द्वेषामुळेच विरोधक एकत्र येत आहेत- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 5:58 AM

माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.

नवी दिल्ली : माझ्याविषयी असलेल्या द्वेषातूनच देशातील सारे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, महाआघाडी वगैरे सबकुछ झुठ आहे. पंतप्रधानपद मिळविणे, ही त्यांची एकमेव लालसा आहे, या विरोधी नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.‘स्वराज्य’ नामक आॅनलाइन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी आपण शहेनशहा वा घराण्याची सत्ता राबविणारा नेता नाही. मी लोकांतून निवडून आलेला प्रतिनिधी आहे, त्यामुळे माझी जनतेशी कायमच नाळ जोडलेली राहील, असेही म्हटले आहे. या मासिकाने जीएसटीसंबंधात मोदी यांनी केलेली विधाने १ जुलै, जीएसटी दिनी प्रसिद्ध केली होती. उर्वरित राजकीय भाग मंगळवारी प्रसारित केला असून, त्यात मोदी यांनी विरोधी पक्षांकडे देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम नसल्याचाही आरोप केला आहे. देशाच्या विविध भागांत होणारे दहशतवादी हल्ले हा इतिहास झाला आहे, यूपीए सरकारच्या काळातच ते होते, असे सांगून जम्मू-काश्मीरमध्ये जबाबदार व उत्तरदायी प्रशासन देण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, नक्षलवाद्यांच्या हिंसाचारातही कमालीची घट झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी आमच्या सरकारची भूमिका असून, पायाभूत सुविधा व सामाजिक विकास यालाच आमचे सरकार प्राधान्य देत आहे, असेही ते म्हणाले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर नक्षल प्रभावित ३४ जिल्ह्यांमध्ये ४५00 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले, २४00 मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले आणि आणखी ४0७२ टॉवर्सना परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर ११ जिल्ह्यांत मिळून नवोदय व जवाहर केंद्रीय विद्यालये सुरू झाली आहेत, त्यामुळे नक्षलग्रस्त भागांतील लहान मुलांना शिक्षण मिळू लागले आहे, असे मोदी यांनी मुलाखतीत नमूद केले. देशातील १२६ जिल्हे पूर्वी नक्षलग्रस्त होते. पण त्यापैकी ४४ जिल्ह्यांतील त्यांचा प्रभाव संपवण्यात आम्हाला यश आले आहे, असे ते म्हणाले.ईशान्येकडील राज्यांत आतापर्यंत विकासाची गंगा पोहोचली नव्हती, आम्ही सत्तेवर येताच त्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले, तेथील दहशतवाद मोडून काढला, तेथे अनेक पायाभूत सुविधा दिल्या, आज तेथे विकासाची कामे जोरात सुरू आहेत, अरुणाचल प्रदेशात प्रथमच व्यावसायिक विमान सेवा आता सुरू झाली आहे, त्या राज्यांतील राजकीय अस्थैर्य संपले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.काँग्रेसची धावपळ स्वार्थासाठीगेल्या चार वर्षांत जवळपास सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला, त्यामुळे त्या पक्षाचा उद्दामपणा, उर्मटपणा संपत चालला आहे. खरे तर मतदारांनीच मतपेटीतून तो संपवला आहे. त्यामुळे आघाडीमार्फत ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस आता अन्य राजकीय पक्षांच्या मागे धावताना दिसत आहे. अर्थात केवळ स्वार्थासाठी काँग्रेसची ही धावपळ आहे, अशी टीका मोदी यांनी केली.मला ऊ र्जा जनतेतूनच मिळतेसुरक्षेविषयी विचारता पंतप्रधान म्हणाले की, मी जनतेतून आलेला माणूस आहे. मी विविध ठिकाणी जातो, तेव्हा हजारो लोक माझ्या स्वागतासाठी येतात, ते मला हात करतात, बंदिस्त कारमधून त्यांच्या दिशेने हात दाखवणे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कारमधून खाली उतरतो, त्यांच्याशी हस्तांदोलन करतो, त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. हे लोकच माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून मला प्रचंड ऊ र्जा मिळते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी