शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

फिर एक बार मुख्यमंत्रिपदी केजरीवाल; तब्बल ७० टक्के दिल्लीकरांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 08:45 IST

आम आदमी पार्टीला ५९ जागा मिळण्याचा अंदाज

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी नोंदवलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे. तर मागील निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी व्होटरनं ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपची सत्ता येईल, असा अंदाज यामधून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी तब्बल ७० टक्के दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. १ ते ६ जानेवारी दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एबीपी न्यूज-सी व्होटरनं १३ हजार ७६ लोकांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेतला. यातील बहुसंख्य जणांनी आप गेल्या निवडणुकीप्रमाणेच शानदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात ८ जागांची घट होईल असा अंदाज आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीला ५९ जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाही दुहेरी आकडा गाठता येणार नाही. देशात सत्ता असलेल्या भाजपाला दिल्लीत केवळ ८ जागा मिळू शकतील. याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी किंचित सुधारेल. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकणारी काँग्रेस यंदा ३ जागा जिंकू शकेल. एकूण ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत बहुमत गाठण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. हा आकडा यंदाही आम आदमी पार्टी अगदी सहज गाठेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांनाच पसंती दिली आहे. केजरीवालच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७० टक्के लोकांनी व्यक्त केला. तर ११ टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांना पसंती दिली. काँग्रेसच्या अजय माकन यांना ७ टक्के, तर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना केवळ १ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. आम आदमी पार्टीला विधानसभा निवडणुकीत ५३.३ टक्के मतं मिळू शकतात. तर लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सर्वच्या सर्व सातही जागा दोन लाखांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत २५.९ टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसला या निवडणुकीत केवळ ४.७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस