शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तत्त्वनिष्ठा, तंत्रज्ञानाच्या ताकदीच्या जोरावर यशस्वी झाले ऑपरेशन सिंदूर: लष्करप्रमुख जनरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:40 IST

पाकिस्तानच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला नाही, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त बळावर लढा देऊन यश मिळविले, असे प्रतिपादन भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी केले. या मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील निष्पाप नागरिक आणि लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला केला नाही, असेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील रीवा येथे पत्रकारांशी बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, भारताने फक्त दहशतवादी पायाभूत सुविधा आणि त्यांचे तळ नष्ट केले.  २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील भागात असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैन्याने हल्ले केले. त्यामुळे चार दिवस संघर्ष झाला. १० मे रोजी लष्करी कारवाया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रनिर्माण ध्येय जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले; कारण आम्ही तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञानाच्या संयुक्त शक्तीने लढलो. आम्ही काळजी घेतली की पाकिस्तानातील कोणताही निरपराध नागरिक बाधित होऊ नये. आमचे लक्ष्य केवळ दहशतवादी आणि त्यांचे नेतृत्व होते.’ ते पुढे म्हणाले, ‘सर्व नागरिकांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या ध्येयासाठी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हावे.’

केवळ दहशतवादी ठिकाणांवरच कारवाई

आपली जुनी शाळा ‘रीवा सैनिक विद्यालया’लाही यावेळी जनरल द्विवेदी यांनी भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान प्रार्थना किंवा नमाज सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही केवळ दहशतवादी असलेल्या ठिकाणांवरच कारवाई केली. निरपराध लोकांवर किंवा लष्करी तळांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor: Principles and Technology Led to Success, Says Army Chief

Web Summary : India's 'Operation Sindoor' succeeded through principles and technology, targeting only terrorist infrastructures in Pakistan-controlled areas, said Army Chief General Dwivedi. No innocent civilians or military sites were attacked during the operation, which followed the Pahalgam attack. The operation aimed to send a message that India is unlike Pakistan.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान