शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

तत्त्वनिष्ठा, तंत्रज्ञानाच्या ताकदीच्या जोरावर यशस्वी झाले ऑपरेशन सिंदूर: लष्करप्रमुख जनरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:40 IST

पाकिस्तानच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला नाही, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त बळावर लढा देऊन यश मिळविले, असे प्रतिपादन भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी केले. या मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील निष्पाप नागरिक आणि लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला केला नाही, असेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील रीवा येथे पत्रकारांशी बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, भारताने फक्त दहशतवादी पायाभूत सुविधा आणि त्यांचे तळ नष्ट केले.  २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील भागात असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैन्याने हल्ले केले. त्यामुळे चार दिवस संघर्ष झाला. १० मे रोजी लष्करी कारवाया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रनिर्माण ध्येय जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले; कारण आम्ही तत्त्वनिष्ठा आणि तंत्रज्ञानाच्या संयुक्त शक्तीने लढलो. आम्ही काळजी घेतली की पाकिस्तानातील कोणताही निरपराध नागरिक बाधित होऊ नये. आमचे लक्ष्य केवळ दहशतवादी आणि त्यांचे नेतृत्व होते.’ ते पुढे म्हणाले, ‘सर्व नागरिकांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या ध्येयासाठी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हावे.’

केवळ दहशतवादी ठिकाणांवरच कारवाई

आपली जुनी शाळा ‘रीवा सैनिक विद्यालया’लाही यावेळी जनरल द्विवेदी यांनी भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान प्रार्थना किंवा नमाज सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही केवळ दहशतवादी असलेल्या ठिकाणांवरच कारवाई केली. निरपराध लोकांवर किंवा लष्करी तळांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor: Principles and Technology Led to Success, Says Army Chief

Web Summary : India's 'Operation Sindoor' succeeded through principles and technology, targeting only terrorist infrastructures in Pakistan-controlled areas, said Army Chief General Dwivedi. No innocent civilians or military sites were attacked during the operation, which followed the Pahalgam attack. The operation aimed to send a message that India is unlike Pakistan.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान