शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:21 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानने भारताची काही विमानं पाडल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र भारतीय संरक्षण दले आणि सरकारकडून याला दुजोरा मिळत नव्हता. त्यावरून राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले होते. दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी विमानांच्या झालेल्या नुकसानाबाबत सिंगापूरमध्ये केलेल्या विधानामुळे देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी देशाबाहेर जाऊन माहिती देण्याआधी ही माहिती संरक्षण मंत्र्यांनी देशातून दिली पाहिजे होती, तसेच झालेल्या नुकसानीबाबत राजकीय पक्षांना सांगितले पाहिजे होते, असेही रमेश यांनी म्हटले आहे. 

सिंगापूरमध्ये आयोजित शांग्री-ला डायलॉक सिक्युरिटी समिटमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षावेळी भारताच्या लढाऊ विमानांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं होतं. मात्र या कारवाईदरम्यान, किती विमानांचं नुकसान झालं, हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. ते म्हणाले होते की, नुकसान किती झालं हे महत्त्वाचं नाही, पण काय चुका झाल्या, हे महत्त्वाचं आहे. तसेच किती नुकसान झालं याचे आकडे महत्त्वाचे नाहीत, तर त्यानंतर काय झालं हे महत्त्वाचं आहे, असेही सीडीएस चौहान म्हणाले होते. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूरात सूर मिसळत जयराम रमेश यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत कारगिल रिव्ह्यू कमिटीप्रमाणे एक तज्ज्ञांची समिती तयार करून भारताच्या संरक्षविषयक तयारीची समीक्षा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आम्हाला जनरल चौहान यांच्या सिंगापूरमधून  आलेल्या वक्तव्यांपर्यंत वाट का पाहावी लागली. जनरल चौहान यांनी जे मुद्दे मांडले ते महत्त्वाचे आहेत, तसेच ते केवळ लष्करी रणनीतीच नाही तर परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण आणि मुत्सद्देगिरीवरही परिणाम करणारे आहेत.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस