शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:23 IST

Operation Sindoor : केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असे संरक्षण मंत्री म्हणाले. या हवाई हल्ल्यात किमान १०० दहशतवादी मारले गेल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही याची पुष्टी केली आहे. बुधवारी रात्री भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेमधील किमान ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. या अहवालात असे म्हटले आहे की, दहशतवाद्यांचे किमान असे १२ अड्डे अजूनही शिल्लक आहेत.

सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, संकटाच्या या काळात आम्ही सरकारसोबत आहोत. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "जर पाकिस्तानने हल्ला केला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. मात्र, सध्या या कारवाईबद्दल फारशी तांत्रिक माहिती देता येणार नाही." सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राजकीय नेत्यांनी या कारवाईबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.

सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी काय म्हणाले?पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईची माहिती सरकारने सर्व राजकीय पक्षांना दिली आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत सांगितले. ते म्हणाले की, "राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत सरकारने म्हटले आहे की, ते सध्या काही गोपनीय माहिती सार्वजनिक करू शकत नाही. अशा संकटाच्या काळात आम्ही सरकारवर यासाठी दबाव आणणार नाही, राष्ट्रीय हितासाठी सरकारसोबत उभे आहोत."

यावेळी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, "राजकीय पक्ष हे जनतेचा आवाज आहेत आणि सर्व नेते एका सुरात बोलत आहेत आणि हे सरकारचे यश आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर सतत घडामोडी घडत आहेत आणि म्हणूनच अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही." पुढील कारवाईबाबत राजकीय पक्षांशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक