शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:31 IST

India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानची नांगी ठेचणारे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडत सीमेवर जोरदार गोळीबार, उखळी तोफांचा मारा सुरु केला होता. याला भारतानेही तसाच तुफान प्रतिसाद दिला होता. पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवानही शहीद झाले होते. बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे सब-इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार हे शहीद झाले होते. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना आमच्या शहीद झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला सिंदूर हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे बीएसएफचे आयजी जम्मू शशांक आनंद यांनी जाहीर केले.

याचबरोबर बीएसएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी फॉरवर्ड ड्युटी पोस्टवर लढा दिल्याचेही त्यांनी सांगितले. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी हे पोस्ट सांभाळल्याचे ते म्हणाले. 

आम्ही ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पॅडना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले. यावेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्व देखील केले. मला आशा आहे की यामुळे देशातील महिलांना बीएसएफमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय सर्वपक्षीय खासदारांच्या टीम परदेशांत जाऊन सांगत असताना भारतीय सैन्यानेही देशात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याचे अधिकारी सीमेवर काय काय घडत होते. आपण कसे पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले याबाबत जाहीरपणे सांगत आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात सोशल मीडियावर प्रपोगेंडा राबविण्यास सुरुवात केली होती. भारताची एवढी विमाने पाडली, एवढी क्षेपणास्त्रे पाडली असे सांगितले जात होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून इंडियन आर्मीने भारतीय जनतेत जाण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल