शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
2
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
3
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
4
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
5
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
6
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
7
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
8
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
9
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
10
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
11
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
12
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
13
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
14
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
15
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
16
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
17
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
18
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
19
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
20
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:31 IST

India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानची नांगी ठेचणारे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडत सीमेवर जोरदार गोळीबार, उखळी तोफांचा मारा सुरु केला होता. याला भारतानेही तसाच तुफान प्रतिसाद दिला होता. पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवानही शहीद झाले होते. बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे सब-इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार हे शहीद झाले होते. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना आमच्या शहीद झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला सिंदूर हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे बीएसएफचे आयजी जम्मू शशांक आनंद यांनी जाहीर केले.

याचबरोबर बीएसएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी फॉरवर्ड ड्युटी पोस्टवर लढा दिल्याचेही त्यांनी सांगितले. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी हे पोस्ट सांभाळल्याचे ते म्हणाले. 

आम्ही ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पॅडना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले. यावेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्व देखील केले. मला आशा आहे की यामुळे देशातील महिलांना बीएसएफमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय सर्वपक्षीय खासदारांच्या टीम परदेशांत जाऊन सांगत असताना भारतीय सैन्यानेही देशात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याचे अधिकारी सीमेवर काय काय घडत होते. आपण कसे पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले याबाबत जाहीरपणे सांगत आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात सोशल मीडियावर प्रपोगेंडा राबविण्यास सुरुवात केली होती. भारताची एवढी विमाने पाडली, एवढी क्षेपणास्त्रे पाडली असे सांगितले जात होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून इंडियन आर्मीने भारतीय जनतेत जाण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल