शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
4
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
5
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
6
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
7
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
8
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
9
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
10
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
11
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
12
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
13
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
14
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
15
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
16
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
17
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
18
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
19
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
20
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:31 IST

India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानची नांगी ठेचणारे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडत सीमेवर जोरदार गोळीबार, उखळी तोफांचा मारा सुरु केला होता. याला भारतानेही तसाच तुफान प्रतिसाद दिला होता. पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवानही शहीद झाले होते. बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात बीएसएफचे सब-इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार हे शहीद झाले होते. या तीन चौक्यांपैकी दोन चौक्यांना आमच्या शहीद झालेल्या जवानांचे नाव आणि एका पोस्टला सिंदूर हे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे बीएसएफचे आयजी जम्मू शशांक आनंद यांनी जाहीर केले.

याचबरोबर बीएसएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी फॉरवर्ड ड्युटी पोस्टवर लढा दिल्याचेही त्यांनी सांगितले. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी एका पोस्टचे नेतृत्व केले. कॉन्स्टेबल मनजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योती, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि इतरांनी हे पोस्ट सांभाळल्याचे ते म्हणाले. 

आम्ही ७० हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि लाँच पॅडना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले. यावेळी आमच्या बीएसएफ महिला जवानांनी सर्व विशेष शस्त्र प्रणालींमधून गोळीबार केला. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने सीमा चौकीचे नेतृत्व देखील केले. मला आशा आहे की यामुळे देशातील महिलांना बीएसएफमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय सर्वपक्षीय खासदारांच्या टीम परदेशांत जाऊन सांगत असताना भारतीय सैन्यानेही देशात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याचे अधिकारी सीमेवर काय काय घडत होते. आपण कसे पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले याबाबत जाहीरपणे सांगत आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात सोशल मीडियावर प्रपोगेंडा राबविण्यास सुरुवात केली होती. भारताची एवढी विमाने पाडली, एवढी क्षेपणास्त्रे पाडली असे सांगितले जात होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून इंडियन आर्मीने भारतीय जनतेत जाण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल