शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”
2
Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता
3
"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या
4
धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली
5
"जरा समजून घ्या यार", प्रेग्नंट पत्नीसोबत दिसला अरबाज खान; पापाराझींना केली विनंती
6
हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण
7
Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
8
प्रेम उद्योगाला 'ब्रेकअप'चा धक्का! 'लग्न' आणि 'डेटिंग' ॲप्स'चे शेअर्स का कोसळतायत? धक्कादायक कारण समोर
9
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
10
ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता
11
"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
12
'२०२५ मध्ये होणार महा विनाश अन्...!'; या तरुणानं केलीय बाबा वेंगांप्रमाणेच धडकी भरवणारी भविष्यवाणी, ही मोठी भाकितं ठरली आहेत खरी
13
Share Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Midcap मध्ये मोठी खरेदी; Dr Reddy's, Eternal, Shriram Finance टॉप गेनर्स
14
Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
15
'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली
16
"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य
17
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
18
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
19
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध

'नुकसान नाही, निकाल महत्वाचा...', ऑपरेशन सिंदूरबाबत CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:21 IST

Operation Sindoor: 'आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.'

Operation Sindoor: भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पुणे विद्यापीठात "भविष्यातील युद्ध आणि युद्धकला" या विषयावर आयोजित केलेल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरवरील महत्त्वाची माहिती सांगितली. या ऑपरेशनवरून असे दिसून येते की, युद्ध हे केवळ एक हल्ला नाही, तर राजकारणाचा एक भाग देखील आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्ध आणि राजकारण एकाच वेळी चालू असताना आम्हाला एक चांगली काउंटर ड्रोन प्रणाली असल्याचा फायदा झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

जनरल चौहान म्हणाले, सैन्य म्हणून आम्हाला नुकसान आणि अपयशाचा त्रास होत नाही. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की युद्धात, नुकसानापेक्षा निकाल महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण होते, ज्यामध्ये कायनॅटिक आणि नॉन-कायनॅटिक युद्ध कौशल्यांचा वापर केला गेला. या युद्धादरम्यान तीन ट्रेंड उदयास आले, जे भविष्यातील युद्धाची रुपरेषा निश्चित करतील.

पहिला: या युद्धादरम्यान सेन्सर तंत्रज्ञान खूप महत्वाचे होते. आपल्याकडे नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही सेन्सर्स आहेत. 

दुसरे: या युद्धात ब्रह्मोस सारख्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. 

तिसरे: यामध्ये मानवरहित प्रणाली, स्वायत्त प्रणालींचा समावेश आहे. मानवयुक्त रणगाडे आणि मानवरहित रणगाडे इत्यादी खूप महत्वाचे असल्याचे सिद्ध झाले, किंवा भविष्यातील युद्धांमध्ये यामुळे मानवी धोका कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा

सीडीएस चौहान यांनी यावेळी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. तसेच, आजचे युद्ध केवळ पारंपारिक शक्तीच्या वापरापुरते मर्यादित नाही, तर ते विविध राजनैतिक, माहितीपर, लष्करी आणि आर्थिक साधनांद्वारे राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया देखील असल्याची म्हटले. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान