शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 08:31 IST

२२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा बदला घेणार असा इशारा भारताने दिला होता.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात 'ऑपरेशन सिंदूर'चा हेतू केवळ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करणे होते. शेजारील राष्ट्राशी लढण्याच्या हेतूने हल्ला नव्हता असं भारताने म्हटलं आहे.

संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. याच ठिकाणावरून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवली जात होती आणि हल्ला घडवला जायचा. भारतीय सैन्याने एकूण ९ ठिकाणांना निशाणा बनवले. आमच्या सैन्याने कुणालाही उकसवलं नाही. कुठल्याही पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांना टार्गेट केले नाही. भारताने टार्गेट निवडीपर्यंत संयम पाळला होता असं म्हटलं आहे.

तसेच भारताने हे पाऊल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उचललं आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशन सिंदूर बाबत लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल असंही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले. हा हल्ला बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद इथे करण्यात आला. २२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा बदला घेणार असा इशारा भारताने दिला होता.

हल्ला झालेली ठिकाणे कोणती?

  1. बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किमी अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
  2. मुरीदके - हे दहशतवादी ठिकाण बॉर्डरपासून ३० किमी अंतरावर होते, तिथे लश्कर ए तोयबाचे सेंटर होते, जे २६/११ मुंबई हल्ल्याशी जोडले होते.
  3. गुलपूर - हे दहशतवादी ठिकाणी LOC पासून ३५ किमी अंतरावर होते. 
  4. लश्कर कॅम्प सवाई - पीओकेच्या तंगाधार सेक्टरच्या ३० किमीवर अंतरावर हे ठिकाण होते.
  5. बिलाल कॅम्प - जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड, हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे
  6. कोटली- एलओसीपासून १५ किमी अंतरावरील लश्कर ए तोयबाचा कॅम्प, याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते
  7. बरनाला कॅम्प - LOC पासून १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे
  8. सरजाल कॅम्प - सांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर जैशचं प्रशिक्षण केंद्र होते
  9. मेहमूना कॅम्प - हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे प्रशिक्षण सेंटर होते, जे बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर होते.  
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर