शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 08:46 IST

Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या.

Operation Sindoor: रात्री ऑफिसमधून घरी येत असतानाच ब्लॅक आऊट करण्यात आला. काही वेळातच ड्रोन हल्ले सुरू झाले. संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता. पाकिस्तानकडून अशा कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानने असे करणे चुकीचे आहे. भारताचे सैन्य त्यांना सडेतोड उत्तर देत आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या देशाचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान मोदी आणि सैन्याचाही आहे. आम्ही हे युद्ध नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास जम्मू काश्मीरमधील स्थानिकांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक पातळीवर काय घडत आहे, याची माहितीही दिली. 

भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय घडले, समजून घ्या

गुरुवारी सायंकाळनंतर पाकिस्तानने भारताच्या अनेक ठिकाणांवर ड्रोनने हल्ले केले. पहाटेपर्यंत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. यानंतर भारताच्या तिन्ही दलांनी आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानचे सगळे हल्ले नेस्तनाबूत केले. पाकिस्तानने जम्मू काश्मीर ते राजस्थान या भागात केलेले ५० हून अधिक हल्ले भारताने निष्क्रिय केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या कराची, लाहोर यासह अनेक ठिकाणी प्रतिहल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले. यातच जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय सैन्यावर विश्वास असून, घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 

जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही

आम्ही रात्री जेवण करत असतानाच आम्हाला हल्ल्याचा आवाज आला. पहाटे ४.३० वाजताही हल्ल्याचे आवाज येत होते. आपल्या सैन्याने त्यांचे हल्ले परतवून लावले. निष्क्रिय केले. आपले सैन्य अलर्ट आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. नागरिकांवर हल्ले करणे योग्य नाही. परंतु, सैन्याशी लढणे पाकिस्तानला शक्य नाही. पाकिस्तानची जी मानसिकता आहे, ते पाहता त्यांच्याकडून हीच अपेक्षा करू शकतो. आम्हाला आमच्या सैन्यावर विश्वास आहे, असे जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांनी म्हटले आहे. 

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

दरम्यान, रात्री सुमारे ८ वाजता तीन ते चार ड्रोन पाहिले. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता. पाकिस्तानने हे योग्य केलेले नाही. पाकिस्तानची ही चूकच आहे. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. पुढे काय होते, हे आता पाहावे लागेल, असेही एका नागरिकाने म्हटले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर