शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:26 IST

Rajnath Singh on Ramcharitmanas Hanuman reference : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या ऐतिहासिक यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रामचरितमानसमधील सुंदरकांडमधील एक महत्त्वाची चौपाई "जिन्ह मोही मारा, ते मैं मारे" चं उदाहरण देऊन धार्मिक पद्धतीने भारताचं धोरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

राजनाथ सिंह यांनी भारताच्या सैन्याच्या विचारसरणीचं वर्णन हनुमानाच्या धोरणासारखंच असल्याचं सांगितलं. "आम्ही फक्त त्यांनाच मारलं, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं. यावरून असं दिसून येतं की, भारताला कोणतंही युद्ध नको आहे, परंतु दहशतवाद्यांबद्दल झिरो टॉलेरेन्स पॉलिसी स्वीकारली आहे. भारतीय सैन्याने कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी आस्थापनांना स्पर्श केला नाही. फक्त जैश, लष्कर आणि हिजबुलच्या दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला करण्यात आला" असं म्हटलं आहे. 

"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सुंदरकांडमधील चौपाईचा खरा अर्थ काय?

"जिन्ह मोहि मारा, ते मैं मारे. तेहि पर बांधेउं तनयं तुम्हारे॥मोहि न कछु बांधे कइ लाजा. कीन्ह चहउं निज प्रभु कर काजा॥"

रावणाच्या दरबारात जेव्हा हनुमान प्रकट होतात तेव्हाचा हा श्लोक आहे. त्यांना विचारलं जातं की, त्यांनी रावणाचा मुलगा अक्षय कुमार आणि अनेक राक्षसांना का मारलं? तेव्हा यामागचं सत्य सांगत अगदी योग्य उत्तर देतात. ते म्हणतात की, मी फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी कोणत्याही निष्पाप व्यक्तीला स्पर्श केलेला नाही.

"आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"

ऑपरेशन सिंदूर आणि हनुमानजी

हनुमान यांचं हे धोरण कोणत्याही राष्ट्रासाठी राजनैतिक आदर्श बनू शकतं, जेव्हा कृती धर्मासाठी असते तेव्हा जबाबदारीने प्रतिसाद देणं हेच धोरण असतं. ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी ऑपरेशन नव्हतं. हा भारताचा संदेश होता की, आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही प्रतिसाद देऊ, पण न्यायाने.

"मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या वडिलांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याने माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे असं म्हटलं. वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, "आज मला खूप आनंद झाला आहे कारण आपल्या सैन्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ लोकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. आज त्या सर्व आत्म्यांना शांती मिळेल हे मला समाधान आहे. ही कारवाई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. हा न्यायाचा क्षण आहे."

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक