शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:55 IST

Operation Sindoor: सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सीमाभागात झालेल्या लघु युद्धाला आता विराम लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना युद्ध स्थगित केले आहे, संपविलेले नाही असा दम भरला आहे. सीमेवर बंदुका, तोफा थंडावल्या आहेत. परंतू, काल रात्री पाकिस्तानने ड्रोन पाठवून थोडी आगळीक केली होती. यामुळे संभाव्य धोका अद्याप टळला नसल्याने एअर इंडिया आणि गो इंडिगोने सीमा भागातील राज्यांच्या विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत. 

सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे. 

भारत सरकारने सोमवारीच सर्व विमानतळांवरील विमान परिचालनावरील बंदी उठविली होती. तसेच आपल्या कंपन्यांशी संपर्क साधावा, असे प्रवाशांना कळविण्यात आले होते. यामुळे आजपासून या विमानतळांवरील विमानसेवा पूर्ववत होईल असे सर्वांना वाटत होते. परंतू, एअर इंडियाने आज आठ प्रमुख शहरांच्या विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणांमुळे या सेवा रद्द करण्यात आल्याचे कारण कंपनीने दिले आहे. प्रभावित विमानतळांमध्ये जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट यांचा समावेश आहे.

तर गो इंडिगोने देखील विमानसेवा रद्द केल्या आहेत. इंडिगो एअरलाइन्सने मंगळवार, १३ मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही एअरलाईन्सनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. बंद असलेल्या मार्गांवर सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इंडिगोने ही अपडेट दिली होती. 

टॅग्स :airplaneविमानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडिया