शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:51 IST

'ऑपरेशन सिंदूर' अनेक गोष्टींसाठी ठरले ऐतिहासिक, दहशतवाद्यांना दिला मोठा धक्का.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर ७ मे २०२५ रोजी सर्वात मोठा लष्करी हल्ला केला, ज्यामुळे दहशतवादाविरुद्ध इतिहास रचला गेला. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, जे केवळ प्रतिहल्ला नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणात्मक क्षमता, राजकीय दृढनिश्चय आणि लष्करी समन्वयाचे प्रतीक बनले आहे. हे ऑपरेशन केवळ धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही तर ते भारताच्या लष्करी इतिहासात एक मैलाचा दगड ठरले.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारताने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या गटांशी संबंधित दहशतवादी कारवायांविरुद्ध कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या दहशतवादी रचनेला मोठा धक्का दिला. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले आणि १७जण जखमी झाले.

पहिल्यांदाच तिन्ही दलांनी संयुक्तपणे हल्ला केला

१९७१ नंतर पहिल्यांदाच लष्कर, हवाई दल व नौदलाने संयुक्त कारवाई सुरू केली आणि पाकिस्तानच्या आत खोलवर हल्ला केला. भारताने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य करून दहशतवादाचा कणा मोडला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने प्रथमच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जाऊन मुरीदके, बहावलपूर, सियालकोट सारख्या प्रमुख ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले.

१९७१ नंतर पहिल्यांदाच लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. भारताने स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर स्मार्ट बॉम्ब या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर या कारवाईत केला. ऑपरेशन सिंदूरने हे स्पष्ट केले की, भारत आता फक्त इशारा देणार नाही तर थेट कारवाई करेल.

सर्वांत मोठा हल्ला

गेल्या पाच दशकांत भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही सर्वांत मोठी आणि सर्वात आतपर्यंत केलेली लष्करी कारवाई होती. यापूर्वी, २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राइकने पाकिस्तानला इशारा दिला होता, परंतु ऑपरेशन सिंदूरने हे स्पष्ट केले की, भारत आता फक्त इशारा देणार नाही तर थेट कारवाई करेल.

अत्याधुनिक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर

या कारवाईत, भारताने पहिल्यांदाच आपल्या अत्याधुनिक शस्त्रांचे उघडपणे प्रदर्शन केले, ज्यात स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर स्मार्ट बॉम्ब यांचा समावेश होता. या शस्त्रांनी पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली अप्रभावी असल्याचे सिद्ध केले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत, भारताने २ प्रमुख दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये डझनभर वाँटेड दहशतवादी ठार झाले आहेत.

दहशतवाद्यांचे नेतृत्व संपविण्याची रणनीती

पहिल्यांदाच, भारताने केवळ दहशतवादी अड्डेच नव्हे तर नेतृत्व पातळीवरील दहशतवाद्यांनाही लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरद्वारे, भारताने संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला की दहशतवाद कितीही आतमध्ये असला तरी, त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकते. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला