शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:51 IST

Operation Sindoor: जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत घेतलेला या हल्ल्याचा बदला, यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

जयराम रमेश म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मागच्या १८ महिन्यात चार हल्ले केले आहेत. आमचे खासदार सध्या इकडे तिकडे फिरत आहेत आणि हे दहशतवादीही इकडे तिकडे फिरत आहेत, असं विधान त्यांनी केलं. त्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जयराम रमेश यांनी आमच्या लोकप्रतिनिधींना दहशतवाद्यांच्या रांगेत उभं केलं आहे. ही काँग्रेसची तीच मानसिकता आहे जी भारताच्या मुत्सद्देगिरी आणि लष्करी प्रयत्नांना कमकुवत करते. आता संसदेने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

शाहजाद पूनावाला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख किरकोळ असा करून जवानांच्या शौर्याचा अपमान करतो. तसेच जागतिक स्तरावर भारत करत असलेल्या प्रयत्नांचीही खिल्ली उडवतो.

दरम्यान, आपल्या विधानावरून वादाला तोंड फुटल्यावर जयराम रमेश म्हणाले की, माझा हेतू केवळ भाजपाला पिंजऱ्यात उभं करण्याचा होता. भाजपा दहशतवाद्यांना सोडून काँग्रेसवर हल्ले करत आहे. खरंतर जिथून धोका आहे तिथे हल्ला झाला पाहिजे, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला. मात्र भाजपाने जयराम रमेश यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपा