शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:02 IST

Opration Sindoor: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याच्या दाव्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले खंडन!

Operation Sindoor: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल(दि.२८) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर दीर्घ चर्चा झाली. यादरम्यान, लोकसभेत बराच गोंधळ झाला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवरील कारवाईची सविस्तर माहिती दिली. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात अमेरिकेचा हस्तक्षेप नव्हता, असे त्यांनी सांगितले. 

मोदी-ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा नाहीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला एकच संदेश होता की, आम्ही दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा आमचा अधिकार वापरत आहोत. ७ मे रोजी ज्या ठिकाणी हल्ला झाला, ते दहशतवादी मुख्यालये आणि पायाभूत सुविधा होत्या. आम्ही पाकिस्तानवर नाही, तर दहशतवादी तळांवर हल्ले केले. पुढे पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम जाहीर करण्यात आला. यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही. २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही." 

जयशंकर पुढे म्हणाले, "आम्ही कधीही अणुबॉम्बच्या धमक्यांना बळी पडणार नाही. आमचा हेतू फक्त पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्याचा होता. मात्र, पाकिस्तानी सैन्याने आपल्या लष्करी तळांवर हल्ले केल्यामुळे, आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले. यापुढेही पाकिस्तानने अशाप्रकारचे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीदेखील पाकिस्तानी सैन्यावर तशाच प्रकारचे हल्ले करत राहू," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

पहलगामनंतर संपूर्ण जग भारतासोबत"आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला दाखवला. पहलगामनंतर जग भारतासोबत होते. पहलगाम हल्ल्यावर जगाने भारताच्या बाजूने काय म्हटले? हे विरोधी पक्ष विचारत आहेत. मी सांगू इच्छितो की, जर्मन परराष्ट्र मंत्री म्हणाले की, भारताला दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आमचा भारताला पाठिंबा आहे. फ्रान्स आणि युरोपियन युनियननेही असेच म्हटले. क्वाड आणि ब्रिक्स सारख्या बहुपक्षीय गटांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला."

जयशंकर पुढे म्हणतात, "२५ एप्रिल रोजी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनीही पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी यावर भर दिला की, कोणत्याही स्वरुपात दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. ९ मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधानांना फोन करून सांगितले की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. पण, पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर पाकिस्तानने हल्ला केला, तर भारत गप्प बसणार नाही. पाकिस्तानमध्ये झालेल्या विध्वंसाचे सॅटेलाईट फोटोज सर्वांनी पाहिले. तुमच्यापैकी कोणाला वाटले होते का की, बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतवादी अड्डे अशा प्रकारे उद्ध्वस्त होतील? मोदी सरकारने हे करुन दाखवले."  

पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले"पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करताना अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, इस्लामाबाद उच्चायोगातील राजदूतांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करणे आणि अटारी सीमा बंद करणे यांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका कठीण परिस्थितीत करण्यात आली आणि हे अभियान भारताच्या क्षमता आणि वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. पाकिस्तानी भूमीतून वाढणाऱ्या दहशतवादाला भारताचा प्रतिसाद केवळ ऑपरेशन सिंदूरपुरता मर्यादित राहणार नाही. भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधही सुरूच राहील," असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.

'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाS. Jaishankarएस. जयशंकर