शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

कृषी कायदे : केवळ राजकारण, केरळ सरकारही 'आप' प्रमाणेच; शाहनवाझ हुसैन याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:40 IST

Farmers Protest : केरळ विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मंजूर, भाजपाकडून टीका

ठळक मुद्देकेरळ विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मंजुरकेरळ सरकारही दिल्लीतील आप सरकारप्रमाणे असल्याचं म्हणत शाहनवाज हुसैन यांची टीका

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. याचदरम्यान केरळ विधानसभेत मुख्यमंत्री विजयन यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर केरळच्या विधानसभेनं हा प्रस्ताव पारित केला. याप्रकणी आता भाजपा आणि शेतकरी नेत्यांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे नेते शाहनवाझ हुसैन यांनी यावरून केरळ सरकारवर जोरदार टीका केली."केरळमधील सरकारदेखील दिल्लीतील आपच्या सरकारप्रमाणेत आहे. कोणत्याही विषय ते समजून आणि जाणून घेत नाहीत. यावर केवळ राजकारण करण्यात येत आहे. केरळ सरकार आपल्यातील कमतरता लपवण्यासाठी कृषी कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करून केवल चर्चेत राहू इच्छित आहे," असं म्हणत हुसैन यांनी निशाणा साधला.  तर दुसरीकडे केरळ विधानसभेनं कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव पारित केल्यानंतर फरीदाबाद येथील शेतकरी नेते बिंदर सिंह गोले वाला यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. "केरळ सरकारनं उत्तम निर्णय घेतला आहे. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. ही गोष्ट केंद्र सरकारलाही समजायला हवी. ४ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या बैठकीत कृषी कायदे रद्द केले पाहिजेत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBJPभाजपाAAPआपKeralaकेरळ