शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

कायद्याचे शिक्षण दर्जेदार असेल तरच देशात कायद्याचे राज्य येणार- सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 11:19 PM

देशात कायद्याचे राज्य आणणे हे सर्वस्वी तेथील कायदा शिक्षणाच्या एकूण दर्जावर अवलंबून आहे, असे मत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली : देशात कायद्याचे राज्य आणणे हे सर्वस्वी तेथील कायदा शिक्षणाच्या एकूण दर्जावर अवलंबून आहे, असे मत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी व्यक्त केले.१० व्या कायदा शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोसायटी आॅफ इंडियन लॉ फर्म्स (एसआयएलएफ) आणि मेनन इन्स्टिट्यूट आॅफ लीगल अ‍ॅडव्होकसी ट्रेनिंग (एमआयएलएटी) यांनी ‘राष्ट्र उभारणीत कायदा शिक्षणाची भूमिका’ या विषयावर परिसंवाद भरविला होता. या परिसंवादात मिस्रा म्हणाले की, कायद्याचे शिक्षण देणाºया संस्थाच देशाला लागणारे कायदेविषयक व्यावसायिक घडवत असतात. देशात कायद्याचे राज्य आणत असताना या व्यावसायिकांची भूमिका एखाद्या पहारेकºयाप्रमाणे असते. कायदा शिक्षणातून मुलांना आपल्या एकूण सामाजिक रचनेचे भान येते, त्यांच्यात एक परिपक्वता येते. त्यामुळेच ते नागरिकांच्या हक्कांचे नीटपणे रक्षण करू शकतात.यावेळी मिस्रा यांनी कायदा शिक्षण देणाºया संस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशातील कायदा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात या संस्थांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कायदा शिक्षणाचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरु करणे भारतासाठी खूप गरजेचे होते. हे शिक्षण घेणाºया मुलांनी देशातील तसेच जागतिक पातळीवरील घडामोडींवर सतत नजर ठेवली पाहिजे. या संस्थांनी मुलांमध्ये कायद्यात अंतर्र्भूत केलेल्या सामाजिक, तात्विक आणि राजकीय बाबींकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा एसआयएलएफ-एमआयएलएटी प्रा. एन. आर. माधव मेनन बेस्ट लॉ टीचर पुरस्कार यावेळी बंगळुरुच्या नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या प्रा. आर. व्यंकटा राव यांना प्रदान करण्यात आला. (वृत्तसंस्था)कायदा शिक्षणसंस्थांची भूमिका महत्त्वाचीदीपक मिस्रा म्हणाले की, कायदा शिक्षणाचा दर्जा वाढविताना शिक्षण संस्थांचे असलेले महत्त्व सतत लक्षात ठेवले पाहिजे. प्रा. एन. आर. माधव मेनन यांनी कायदा शिक्षण संस्थांच्या जडणघडणीत भरीव योगदान दिले आहे.प्रा. मेनन म्हणाले की, देशात कायदा शिक्षण देणाºया संस्थांकडे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. भारतात आज जरी राष्ट्रीय स्तरावरील २३ कायदा विद्यापीठे असली, तरी भारताला या शिक्षणात बरीच मोठी मजल गाठायची आहे.

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय